वीजप्रश्नी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २२) महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.
वीजप्रश्नी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २२) महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. 
मुख्य बातम्या

वीजप्रश्नी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर ः शेतीपंपांचे कनेक्‍शन, प्रलंबित प्रश्‍न, शेतीसाठी सकाळी बारा तास वीज द्यावी, चुकीचे भारनियमन, वाढीव वीजबिल, घरगुती व औद्योगिक संभाव्य वीजदरवाढ, शेतीपंपांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. २२) महावितरण कार्यालयावर धडक मारली. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, मुद्दा शेतकरी पंपांचा आमच्या हक्काचा, वीजबिल भरण्यात राज्यात आम्ही एक नंबर पण तुमच्या भोंगळ कारभाराने आमची मोडलीया कंबर, अहो सरकार, शेतकऱ्यांच्या उसावर टाकताय वीजबिल दरवाढीचा बोजा, प्रामाणिकपणे बिल भरल्याचीच देताय आम्हाला सजा, महावितरणचा दाबाय लागतोय खटका राज्य सरकारला घ्यायला लागतोय झटका, नादुरुस्त मीटर तुम्ही नाय बदलणार अन् दुप्पट-तिप्पट बिल आम्हाला लावणार हा सावकारी कारभार आता नाही चालणार, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांबरोबर औद्योगिक ग्राहकांवर वीज दरवाढ लादणाऱ्या महावितरण कंपनीचीच फ्यूज उडविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चास प्रारंभ झाला.  श्री. पाटील म्हणाले, की महावितरण व सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी व आैद्योगिक क्षेत्रातील उद्योजक रस्त्यावर आले आहेत. २१ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला महावितरणने दिला आहे. मुळात कृषी पंपांच्या संदर्भातील वीज जोडणीचे ६००० प्रस्ताव एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रलंबित आहेत. घरगुती वीजबिलामध्येही दहा-बारा टक्के वाढीचा प्रस्ताव आहे. शासनाची फ्यूज मोर्चाच्या माध्यमातून काढण्याची वेळ आली आहे. महावितरण कंपनीने एका वर्षात तीन वेळा वीजदरात वाढ केली आहे. ही अन्यायी वीजदरवाढ २७४ टक्‍के आहे. पुढे टप्प्याटप्प्याने यात वाढ होणार असून एप्रिल २०१९ पर्यंत कृषी पंपांचा वीजदर दुप्पट, तिप्पट होणार आहे. आयोगाने लागू केलेल्या दरातील वाढीची संपूर्ण रक्‍कम कृषी पंपधारक शेतकऱ्यांना भरावी लागेल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. ही वीज दरवाढ शेतकरी व सहकारी पाणी पुरवठा संस्थांना परवडणारी नाही. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून त्यातून मार्ग काढणे आवश्‍यक आहे.  ‘‘२०१४-१५ पासून कृषी पंपांना नवीन वीज कनेक्‍शन दिलेले नाही. त्यामुळे पाणी असूनही शेतीसाठी पाणी मिळू शकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नवीन कृषी पंपांनाही वीज कनेक्‍शन मिळत नाही. महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचा हा खेळ मांडला आहे. याच्या विरोधात भविष्यात मोठे आंदोलन केले जाईल’’, असा इशाराही त्यांनी दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT