मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा किमान समान कार्यक्रम महाविकास आघाडीने गुरुवारी (ता. २८) जाहीर केला. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा योजनेची पुर्नरचना, शेतीमालाला योग्य भाव आणि दुष्काळी भागाला संजीवनी देणारी शाश्वत पाणी योजना त्यासोबतच बेरोजगारी, उद्योग वृद्धी, महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण आदींच्या बाबतीत महाराष्ट्राला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधीच्या काही तास आधी महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रम जाहीर केला.
या तिन्ही नेत्यांनी सविस्तरपणे आघाडीच्या विकासाचा अजेंडा मांडला. यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रत्येक निर्णय हा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकात सांगितलेल्या मूल्यांना धरुन असेल. या आघाडीची स्थापनाच या मूल्यांच्या आधारावर करण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करणारी आघाडी असेल. या आघाडीच्या प्रत्येक निर्णयामध्ये भारतीय संविधानात सांगितलेली मूल्ये आणि तत्व केंद्रस्थानी असतील.
या आघाडीचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्राला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाणे हा असेल. महाराष्ट्र विकास आघाडीचे निर्णय समाजातील सर्व घटकांसाठी समान असणार आहेत. यामध्ये भाषा, जात, धर्म आदी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. आज राज्यात वाढलेली बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेची सुरू असलेली घसरण यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष वाढला आहे. या विद्यमान परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे राज्याच्या विकासाला नवी दिशा देणार आहेत. ही आघाडी या देशातील, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतिबिंब आहे. कोणालाही भीती वाटणार नाही, कोणालाही झुकते माप देणार नाही, सर्व समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणे हाच महाराष्ट्र विकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीने आखलेल्या कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समन्वय समिती केंद्र आणि राज्यातील संवेदनशील विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
किमान समान कार्यक्रमातील ठळक वैशिष्ट्ये शेती
बेरोजगारी
महिला
शिक्षण
आरोग्य
उद्योग
सामाजिक न्याय
आणि इतर महत्वाचे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.