मूग, उडीद, सोयाबीन विक्रासाठी परभणी जिल्ह्यातील २७०७ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील ५४३७ अशा एकूण ८१४४ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर शेतमाल घेऊन येण्यासाठी मोबाईल संदेश पाठविण्यात आले होते; परंतु शुक्रवार (ता. २२) पर्यंत दोन्ही जिल्ह्यांतील ३४०५ शेतकऱ्यांचा मूग, उडीद, सोयाबीन असा एकूण २१ ८७१.५६ क्विंटल शेतीमाल खरेदी करण्यात आला आहे. तूर्त ४७३९ शेतकऱ्यांनी अद्याप नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीस आणलेला नाही.
दोन जिल्ह्यातील एकूण ४२७३ शेतकऱ्यांपैकी ७९३ शेतकऱ्यांचा १२,३२२.८८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. ३४८० शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस आणले नाही. खरेदी केलेल्यापैकी १०,३४३ क्विंटल सोयाबीन वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठविण्यात आले आहे. १९७९.८८ क्विंटल सोयाबीन खरेदी केंद्रावर आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.