Farmers in Aurangabad, Jalna and Beed districts are in dire need of fertilizers
Farmers in Aurangabad, Jalna and Beed districts are in dire need of fertilizers 
मुख्य बातम्या

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची होतेय खतांसाठी वणवण

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित खते मिळतच नसल्याची स्थिती कायम आहे. वणवण फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  युरियाचा तुटवडा आहे. खत मिळाले, तर नशीबच उजाडले, अशीच शेतकऱ्यांची भावना आहे. 

औरंगाबादमध्ये कृषिमंत्र्यांनी उचललेल्या पावलामुळे निदान आता तरी शेतकऱ्यांना खते मिळतील, असे वाटत होते. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना अपेक्षित खते मिळत नसल्याची स्थिती आहे. औरंगाबाद, जालना, बीड या तीनही जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा जाणवत आहे. इतरही अनेक खते मागणीनुसार मिळतच नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

पेरणीपूर्वी ही खताची सोय करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. आता पहिला, दुसरा खताचा डोस देण्यासाठी खतांची आवश्‍यकता आहे. मात्र, त्यासाठी वणवण फिरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर यंत्रणेने केलेल्या  खत उपलब्धतेच्या दाव्याचे काय, असा प्रश्न  उपस्थित होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

SCROLL FOR NEXT