नांदेड ः ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता.7) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नांदेड ः ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे गुरुवारी (ता.7) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  
मुख्य बातम्या

ऊसदरासाठी स्वाभिमानी संघटनेने केले आंदोलन

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन 3 हजार रुपये भाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावमी करावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुवारी (ता.7) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सर्वच प्रकारच्या शेतीमालाचे उत्पादन घटल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करत शेतीमाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार भाव देण्यात यावा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले पाटील (नांदेड), रामप्रसाद अडकिने (हिंगोली) यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हदगांव, भोकर, कंधार या तालुक्‍यांसह उमरी, धामधरी, कामठा, मेंढला आदी 32 ठिकाणी तसेच हिंगोली जिल्ह्यात डोंगरकडा तसेच अन्य ठिकाणी रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये शेतकरी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. साखर कारखाना प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झाले, असे श्री. इंगोले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT