माळकोळी, जि. नांदेड ः पैसेवारी ५२ पैसे काढल्याच्या निषेधार्थ येथील शेतकऱ्यांनी सोमवारी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये नांगर फिरविताना शेतकरी.
माळकोळी, जि. नांदेड ः पैसेवारी ५२ पैसे काढल्याच्या निषेधार्थ येथील शेतकऱ्यांनी सोमवारी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये नांगर फिरविताना शेतकरी. 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी फिरवला उभ्या पिकावर नांगर

टीम अॅग्रोवन

माळकोळी, जि. नांदेड : खरीप पिकांचे उत्पादन कमी आले असतानाही महसूल प्रशासनाने पैसेवारी ५१ पैसे आल्याचे जाहीर केले. त्यातही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी (ता. १३) गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत शेतातील सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला.  नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. यावर्षीही अनियमित पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, पूर्णपणे तर कापूस आणि तूर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न निम्याहून कमी येत आहे. एकरी १५ ते १८ हजार रुपये उत्पादन खर्च आला असून, उत्पन्न मात्र एकरी दीड ते दोन क्विंटल झाले. यामुळे शिवारातील सुमारे १०० एकर जमिनीवरील सोयाबीन पिकाची काढणी न करताच नांगर फिरवला. तरीही प्रशासनाने गावशिवारीतील खरीप पिकांची पैसेवारी ५१ पैसे काढली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाच्या निषेधार्थ वाजंत्री लावून वाजत गाजत शेतातील उभ्या सोयाबीन पिकावर नांगर फिरवला. सोमवारी (ता. १३) सकाळी १० वाजता शेतकरी मोठ्या संख्यने माळाकोळी येथील शिवाजी चौकात एकत्र आले. तेथून वाजत गाजत मोहन शूर यांच्या शेतात जाऊन उभ्या सोयाबीन पिकात नांगर फिरवण्यात आला. यानंतर परत येऊन शिवाजी चौकामध्ये माळाकोळी येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.  या उपोषणाला माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, दत्ता पवार, शिवसेनेचे मुक्तेश्वर धोंडगे, सभापती पंडित देवकांबळे, शिवाभाऊ नरंगले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. उभ्या पिकावर नांगर फिरवण्याचा निर्णय मोहन शूर, अशोक जायभाये, देवासिंह बयास, संजय नागरगोजे, विठ्ठल जेलेवाड,  मारोती कागणे, आदिनाथ मुस्तापुरे, चंदुदेव जोशी, व्यंकटराव पवार, एकनाथ पवार, अंगद गिते, राम पवार, उत्तम घुगे, लहू तिडके, बंडू केंद्रे, लक्ष्मण पुरी, सचिन पवार, दीपक कागणे या शेतकऱ्यांनी घेतला आहे. प्रतिक्रिया पाच बॅग सोयाबीन पेरलं. एकरी पंधरा हजार रुपये खर्च केला; मात्र पाऊस वेळेवर न पडल्यामुळे सोयाबीन पूर्णपणे वाया गेले. काढणीच्या खर्चात पडायचे कशाला म्हणून आम्ही उभ्या पिकावर नांगर फिरवला. - बंडू केंद्रे, शेतकरी

भरमसाठ खर्च होऊनही अनियमित पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी ही पिके पूर्णपणे गेली आहेत. मग काढणी मळणीचा खर्च करून कर्जबाजारी होण्यापेक्षा उभ्या पिकावर नांगर फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. - व्यंकटकराव पवार, शेतकरी

पीक पैसेवारीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे दुलर्क्ष करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लागत आहे.  - जालिंदर कागणे, सरपंच, माळकोळी, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT