award
award  
मुख्य बातम्या

शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन

जळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या समस्यांवरचा उपाय नाही. कर्जमाफी हा केवळ प्रथमोपचार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष कृती आराखडा तयार करत आहे.  शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. १५) येथे दिले.   जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आयोजित पद्मश्री अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘शेतकरी हा आपल्या राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे राहील. प्रत्येक शेतकरी संपन्न झाला पाहिजे, त्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत, म्हणून शासन कृतिशील कार्यक्रम तयार करत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज, तसेच मुबलक पाणी हवे आहे, याची मला कल्पना आहे, त्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल. भारताला संपन्न राष्ट्र बनवायचे असेल तर शेती आणि शेतकऱ्यांना सन्मान द्यावा लागणार आहे.’’ या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, दलीचंद जैन, कविवर्य ना. धों. महानोर आदी उपस्थित होते. हा पुरस्कार नंदापूर (जि. जालना) येथील शेतकरी दत्तात्रेय भानुदासराव चव्हाण यांना या वेळी प्रदान करण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह , शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.  जैन इरिगेशन सिस्टिम लि.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी आभार मानले.  केंद्राच्या सहकार्याची गरज ः शरद पवार शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवण्यासाठी केंद्राने राज्याला सहकार्य करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT