अखेर ई-पास रद्द; हॉटेल व लॉजिंग सुरू पण...
अखेर ई-पास रद्द; हॉटेल व लॉजिंग सुरू पण... 
मुख्य बातम्या

अखेर ई-पास रद्द; हॉटेल व लॉजिंग सुरू पण...

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘अनलॉक ४’ च्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून राज्य सरकारने त्यात जनतेला मोठा दिलासा दिला आहे. एक सप्टेंबरपासून राज्यात प्रवासासाठी ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. शाळा-कॉलेज मात्र अद्याप बंद राहणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन असणार आहे. राज्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, येत्या एक सप्टेंबरपासून मुंबईतील विमान उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे. तसेच जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची गरज लागणार नाही.तसेच हॉटेल आणि लॉजही सुरू करण्यात येणार आहेत. मेट्रो आणि चित्रपटगृह बंद राहतील. मंदिरे आणि जिमबद्दल अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

हे सुरू

  • राज्यातील हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरू होणार
  • खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा
  • हे बंद

  • शाळा-कॉलेज, शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार
  • मेट्रो बंदच
  • चित्रपटगृह
  • स्वीमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील चित्रपटगृह, बार, ऑडिटोरियम
  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT