do the Punchnama of damaged crops in Aurangabad: Desai
do the Punchnama of damaged crops in Aurangabad: Desai 
मुख्य बातम्या

औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा ः देसाई

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन त्वरित पंचनामे करा’’, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील, तसेच महानगर पालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा बुधवारी (ता. १६) देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले उपस्थित होते. 

देसाई म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतचे त्वरित सर्वेक्षण करुन पंचनामे करावे, जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यात मुख्यमंत्री यांची संकल्पना असलेले ‘विकेल ते पिकेल'' या धर्तीवर कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाचा समावेश करावा. रेशीम, कापूस, मका इत्यादी पिकांवर प्रक्रिया करुन उत्पादनाचा समावेश केल्यास रोजगार निर्मिती होऊन युवा शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळेल.’’

जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल, तालुका पातळीवरील संकुलाची कामे आणि क्रीडा संदर्भातील प्रगतीपथावरील विविध कामे आणि पुढील नियोजनाचे प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT