मुख्य बातम्या

वादळामुळे दिल्लीतील शाळा बंद, जनजीवन विस्कळीत

वृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यातच उत्तर भारतात धुळीच्या वादळामुळे 127 हून जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले होते. आता दिल्लीत गुडगांवसह अन्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीज प्रवाह खंडीत झाला, तसेच झाडे मूळासकट उन्मळून पडली आहेत. या अकाळी पावसामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यामुळे येथील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या वादळी वाऱ्यामुळे दिल्ली मेट्रोलाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ 90 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेगाने आल्यास मेट्रोची वाहतूकही थांबवण्यात येईल. 

उत्तर भारतात दिल्लीसह 13 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. या राज्यातील काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT