कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा छळ
चांदवड : कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राज्य सरकार अटी-शर्तींमध्ये शब्दांचे खेळ करून शेतकऱ्यांचा छळ करीत आहे. कर्जमाफीची योजना फसवी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त येथील रेणुका लॉन्समधील शेतकरी मेळाव्यात भुजबळ बोलत होते.
माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अभीष्टचिंतन करण्यात आले. या वेळी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार किशोर दराडे, माजी आमदार जयंत जाधव, डॉ. भारती पवार, सयाजीराव गायकवाड, उषा बच्छाव, संजय बनकर, उपसभापती अमोल भालेराव, नगराध्यक्षा रेखा गवळी, डॉ. अरुण निकम, अशोक गायकवाड, संजय जाधव, समाधान जामदार, पोपटराव पवार, रावसाहेब भालेराव, विक्रम मार्कंड, राजेंद्र गिडगे, दिलीप धारराव, शिवाजी बस्ते, बाळासाहेब ढोबळे, मोहन चकोर, दत्तात्रय माळी, देवीदास शेलार, रामकृष्ण तिडके, पोपटराव पगार, सुरेश उशीर, पंढरीनाथ खताळ, भीमराव जेजुरे, जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. युतीचे सरकार ग्रामीण भागातील जनतेकडे दुर्लक्ष करीत असून, शहरातील लोकांकडे लक्ष केंद्रित केले असल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त करू पाहत असल्याची टीका या वेळी श्रीराम शेटे यांनी केली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सरकारच्या आरक्षणाच्या फसव्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उभे करून मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काँग्रेसचे सरकार निवडून देण्याचे आवाहन केले.
दिलीप धारराव यांनी प्रास्ताविक केले. संजय जाधव यांनी आभार मानले. यशवंते यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास शिवाजी कासव, राजेंद्र पवार, कैलास शिंदे, रवींद्र अहिरे, नवनाथ आहेर, अलताफ तांबोळी, रविकांत गवळी, नंदकुमार कोतवाल, गणेश ठाकरे, दत्तात्रय वाघचौरे, रामदास कोल्हे, शंकरराव गांगुर्डे, पंकज दखणे आदी उपस्थित होते.