crops under water
crops under water  
मुख्य बातम्या

कऱ्हाड, पाटणला पिके पुराच्या पाण्याखालीच

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा : मुसळधार पावसाने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले आहे. त्यामुळे कऱ्हाड-पाटण (जि. सातारा) तालुक्यात दोन आठवड्यांपासून अधिक काळ पिके पाण्याखाली आहेत. परिणामी पिकांच्या शेंड्यात पाणी जाऊन पिके कुजून जाण्याच्या मार्गावर आहेत.  कऱ्हाड-पाटण तालुक्यात जूनच्या मध्यावर पेरणी झालेली पिके उगवून आली, मात्र ती पाण्यात राहिल्याने पिवळी पडून वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस पिके पाण्यात राहिल्यास शेतकऱ्यांच्या हातची पिके जातील, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.  कऱ्हाड-पाटण तालुक्यात दोन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पावसाने खरिपातील पिकांना जीवदान मिळाले. मात्र सुरू झालेला पाऊस कमीच झाला नाही. त्यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. परिणामी शिवारतही पाणी साचून राहिले आहे. अगोदरच नदी, ओढे फुल्ल भरून वाहत असल्याने शेतातील पाण्याचा निचरा व्हायला जागाच राहिलेली नाही. त्यामुळे पाणी शिवारात साचून राहिले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नैसर्गीक ओढे, नाले बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे शिवारातील पाण्याच्या निचऱ्याला जागाच मिळत नसल्यानेही शहरालगतची शेती पाण्याखाली राहिली आहे.  दोन्ही तालुक्यांत नदी पात्राबहेर पाणी आल्याने नदीकाठची शेतीही पाण्याखालीच गेली आहे. त्याचबरोबर महामार्गाकडेच्या सेवा रस्त्याकडेचेही नाले तुंबल्याने शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. त्याचबरोबर पाऊसच कमी येत नसल्याने अनेक ठिकाणी शिवारात पाणी वाढून पिकांच्यावर चार ते पाच फूट पाणी होऊ लागले आहे. त्यामुळे पिकांच्या तुऱ्यात पाणी जाऊन त्यांची वाढ खुंटू लागली आहे. त्याचबरोबर पिके पिवळी पडून वाया जाण्याच्या स्थितीत आहेत. अजूनही काही दिवस पाऊस असाच राहिल्यास पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

पंचनामे करण्याची मागणी  दोन आठवड्यांहून अधिक काळ पिके पाण्याखाली राहिल्याने आणि पावसाचा जोर कायम असल्याने पिके वाया जाण्याच्या मार्गवर आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेरपासने करून, व्याजाने पैसे घेऊन यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेने आपल्या शिवारात पेरणी केली आहे. मात्र सततच्या पावसाने बहुतांश ठिकाणची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT