Complaint for ‘Mango Spring’
Complaint for ‘Mango Spring’ 
मुख्य बातम्या

‘आंबे बहर’च्या भरपाईसाठी तकरी पात्र

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली ः गतवर्षी डाळिंबाचा आंबेबहार हंगामाचा शेतकऱ्याने भरला. त्याची नुकसान भरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरले आहेत. दिघंची मंडलसाठी ५४ हजार, तर आटपाडी मंडलासाठी २४ हजार रुपये हेक्‍टरी नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंकेतील खात्यांवर रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.

गतवर्षीच्या आंबेबहरात तालुक्‍यात अंदाजे तीन हजार हेक्‍टर क्षेत्राचा हंगाम डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी धरला होता. साधारण हा हंगाम एक जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान धरला जातो. त्यासाठी ३१ डिसेंबरअखेर विमा भरला जातो.

कृषी विभागाच्या आवाहनानंतर तालुक्‍यातील आटपाडी आणि दिघंची मंडलच्या शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०१९ अखेर आंबे बहराचा विमा भरला होता. विमा रकमेच्या पाच टक्के हिस्सा हेक्‍टरी ६५०० रक्कम शेतकऱ्यांनी भरला होता. या हंगामाला तीव्र उष्णतेचा आणि पावसाचा खंड याचा फटका बसला होता. त्यामुळे काही शेतकरी विमा नुकसान भरपाई पात्र ठरले होते. 

शेतकऱ्यांची संख्येची माहिती नाही

दर वर्षी आंबे बहरातील शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत मंजूर झालेली विमा रक्कम मिळते. यावर्षी विलंब झाला. सप्टेंबरपर्यंत विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संभ्रमावस्था होती. अखेर विमा रक्कम मंजूर झाली. याबाबत अद्याप शेतकऱ्यांची संख्या, क्षेत्र आणि रक्कम याची माहिती कृषी विभागाकडे आलेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT