धर्मादाय संस्थांकडून यंदा तीन हजार विवाह
धर्मादाय संस्थांकडून यंदा तीन हजार विवाह 
मुख्य बातम्या

धर्मादाय संस्थांकडून यंदा तीन हजार विवाह

हरी तुगावकर

लातूर : ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्याअभावी कुटुंबातील मंगलकार्य हे एक दडपणच असते. आपत्यांच्या लग्न चिंतेने कुटुंबीय अस्वस्थ असतात, अशाच सुधारणावादी विचारसरणीतून पुढे आलेले विचार लग्नसोहळ्यास एक उच्च दर्जा प्राप्त करून देतात. सामुदायिक विवाह सोहळे हा त्यातीलच एक महत्त्वपूर्ण उपक्रम. या उपक्रमांना राज्यातील धर्मादाय संस्थांनीही साथ दिल्यानंतर सामाजिक आणि आर्थिक ताण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून यंदा राज्यभर सामूहिक विवाह सोहळे झाले. यात तीन हजार ४६ लेकींचे कन्यादान करण्यात आले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदच असे घडले. जात, धर्माच्या पलीकडे जाऊन या सोहळ्यांनी सामाजिक सलोखा जपत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

संस्थांचा पैसा काढला बाहेर अनेक धार्मिक, धर्मादाय संस्थांकडे पैसा पडून आहे, हे श्री. डिगे यांच्या लक्षात आले. या पैशाचा योग्य वापरासाठी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना अमलात आणली. दोन जिल्हे वगळता प्रत्येक जिल्ह्यात असे सोहळे पार पडले. सर्व व्यवस्था संस्थांनी केली. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांतील मुला-मुलींचे लग्न लावून सामाजिक सलोखा जपण्यात आला. अभिनेत्यांपासून ते नेत्यापर्यंत सर्वांनी या सोहळयांना हजेरी लावली.

गरीबांचे २०० कोटी वाचले गरीब कुटुंबातील लग्न म्हटले तरी वधू-वरांच्या दोन्ही बाजूने किमान पाच-सात लाख रुपये खर्च येतो. येथे तर तीन हजार ४६ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. एक पैशाचाही खर्च वधू-वरांना आला नाही. यातून राज्यभरातील गरीब कुटुंबांतील या लग्नाच्या खर्चाचे किमान २०० कोटी रुपये वाचले आहेत. हे या सोहळ्यांचे यश आहे.

३०० क्विंटल धान्याची नासाडी वाचली लग्न म्हटले की अक्षता आल्याच. प्रत्येक लग्नात किमान दहा किलो तरी धान्यापासून अक्षता तयार केल्या जातात. एक प्रकारे ती नासाडीच असते. पण या सोहळ्यात त्याला फाटा देण्यात आला. अक्षता म्हणून सर्वांना फुले देण्यात आली. यातून ३०० क्विंटल धान्याची होणारी नासाडी मात्र वाचली आहे. गरीब, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आपल्या आपत्त्यांच्या लग्नाची चिंता वाटत असते. या सोहळ्यामुळे धर्मादाय संस्थाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. मदतीसाठी हजारो हात पुढे आले. घरचे कार्य म्हणून सर्वांनी काम केले. अवघ्या दीड महिन्यात तीन हजार लग्न लावण्यात यश आले. या पुढेही असेच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. - शिवकुमार डिगे, राज्य धर्मादाय आयुक्त.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT