आठवडाभर पावसाचा खंड कायम
आठवडाभर पावसाचा खंड कायम 
मुख्य बातम्या

आठवडाभर पावसाचा खंड कायम

टीम अॅग्रोवन

पुणे : महाराष्ट्रात मॉन्सूनने चांगली सुरवात केल्यानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने खंड दिला आहे. हा खंड आणखी आठवडभर राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून (ता. १६) पावसाला पोषक स्थिती तयार होणार असल्याने राज्यात पुन्हा पाऊस सुरू होणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.   गतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये माॅन्सूनने जवळपास ५५ दिवसांचा ब्रेक घेतला होता. याचीच पुनरावृत्ती यंदा होत असल्याचे दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसातील या खंडाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा परतीच्या पावसावरच असून, आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसानेच या भागाला तारले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) गुरुवारी (ता. ९) प्रसिद्ध करण्यात आलेल्या साप्ताहिक अहवालानुसार, १५ ऑगस्टपर्यंत नैऋत्य माॅन्सून देशाच्या उत्तर भागात जास्त सक्रिय राहील. मॅान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे असल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस अधिक असेल. तर राज्यात मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार, उर्वरित भागात हलक्या सरी पडतील. १३ ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. माॅन्सूनचा आसही दक्षिणेकडे येऊन तिसऱ्या आठवड्यात (१६ ते २२ ऑगस्ट) महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.  प्रतिक्रिया महाराष्ट्रात हवेचा दाब वाढला असून, उत्तर महाराष्ट्रात हे दाब १००६ तर दक्षिणेकडे १००८ हेप्टपास्कल झाले अाहेत. वाऱ्यांची दिशा बदलण्यास सुरवात झाली आहे. सध्या राज्यात मॉन्सूनला जोर राहिलेला नाही. आठवडाभरात उत्तर भारतात पाऊस अधिक असेल, कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार असून, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर त्यानंतर १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.  -डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT