पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर द्या : येरावार
पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर द्या : येरावार 
मुख्य बातम्या

पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर द्या : येरावार

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यात सरासरी समाधानकारक पाऊस झाला. पाणीपातळी देखील चांगली आहे. पाझर तलाव, एमआय टॅंक, निळोणा, चापडोह धरण ओव्हर फ्लो झाले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ११ टॅंकर सुरू होते. या वर्षी अशी स्थिती होऊ नये, याकरिता जलयुक्‍तच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दुष्काळ निवारण आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार निलय नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड, तहलसीलदार शैलेश काळे, पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर या वेळी उपस्थित होते.

यवतमाळ तालुक्‍यात राष्ट्रीय महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ५१ विहिरींना मंजुरी देण्यात आली. यापैकी ४७ पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढली. मात्र सध्या ऑक्‍टोबर महिन्याची उष्णता बघता ती झपाट्याने खालावू शकते. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी योग्य नियोजन करा. शहरामध्ये भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, याकडे जीवन प्राधिकरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लक्ष द्यावे, अशा सूचना येरावार यांनी केल्या.

येरावार यांनी या वेळी दुष्काळग्रस्त भागातील पिकाची पाहणी केली. यामध्ये यवतमाळ तालुक्‍यातील कोळंबी येथील गजानन चिकटे, अकोला बाजार येथील प्रफुल्ल जगताप आणि विजय सिडाम यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांची पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT