In Ambad area, cotton is being sold in a single sale
In Ambad area, cotton is being sold in a single sale 
मुख्य बातम्या

अंबड परिसरात कपाशीचा एकाच वेचणीत होतोय खराटा

टीम अॅग्रोवन

अंबड, जि. जालना : तालुक्यात खरीप पिकांची चांगलीच वाट लागली आहे. पांढरे सोनं व नगदी पीक म्हणून शेतकरी कपाशीकडे पाहतो. मात्र, एकाच वेचणीत कपाशीचा खराटा झाला आहे. तर, बाजरी, सोयाबीन, मका, मूग, उडीद यांची पुरती वाट लागली आहे.

खरीप पेरणीत केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी आता चांगलाच आर्थिक अडचणीत आला आहे. कापसातून चार पैशांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा बाळगत असताना पुरती निराशा झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच वेचणीसाठी महिला मजूर मिळत नाही. सोंगणी केलेली बाजरी, सोयाबिनची नासाडी झाली आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्यापपर्यंत सुरु झालेले नाही. यामुळे शेतकरी चोहोबाजुने कोंडीत सापडला आहे. 

तुरीचे पीक जोमात 

सध्या जिकडे तिकडे शेतं पिवळी धमक दिसत आहेत. तुरीचे पीक जोमात आले आहे. मात्र वातावरणात सतत होणारा बदल, ढगाळ वातारवण, धुक पडण्याची भीती, यामुळे जोमात आलेल्या तुरीचे पिक कोमात जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. खरिपाची सगऴीच पिके हातची गेल्याने तुरीतून चार पैसे हातात पडतील, अशी आशा शेतकरी बाळगून आहे. यामुळे तुरीच्या पिकांवरच पूर्ण भिस्त अवलंबून आहे.

शेतात दोन बंग कपाशीची लागवड केली. त्यासाठी बियाणे, खते, औषधे, मशागत, वेचणी यासाठी सरासरी आठ ते दहा हजार रुपये खर्च केला. यामध्ये केवळ वेचणी केल्यानंतर नव्वद किलो कापूस हातात पडला. यामुळे केलेला खर्च वसुल झाला नाही. - योगेश जोशी, शेतकरी, अंबड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT