अजित पवार
अजित पवार 
मुख्य बातम्या

विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित पवार

टीम अॅग्रोवन

नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा आगडोंब करणारे हे विश्वासघातकी, खोटारडे सरकार आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याएवजी या सरकारने शेतकरी संपवण्याचाच चंग बांधला आहे. मात्र शेतकऱ्यांचे झालेल्या वाटोळ्याची किंमत सरकारला मोजावी लागेल. पैसे बुडवणाऱ्यांना पाठबळ देणारे हे सरकार गरिबांना आणखी गरीब करीत असल्याचा आरोप करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव, राहुरी, कोपरगाव, अकोले येथे ‘हल्लाबोल’ यात्रेनिमित्त सभा झाल्या. अजित पवार यांच्यासह माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम कोते यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या सभांतून सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. राहुरीच्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, की पायाभूत सुविधांवर खर्च केल्यास राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर वाढेल. मुख्यमंत्र्यांनी मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाबाबत झुलवत ठेवले. मूळ आरक्षणाला धक्का न लावता, आर्थिक निकषावर गरिबांना आरक्षण द्यावे, असे आमचे मत आहे.  ‘‘साखर कारखान्यांची वीज सरकार खरेदी करीत नाही. चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आला. शिवसेना शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखविते. विजय मल्ल्या, नीरव मोदी बॅंका बुडवून देशाबाहेर पळाले. त्यांचे काहीच वाकडे करत नसलेले सरकार शेतकऱ्यांना मात्र वेठीस धरत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना ऐतिहासिक, सरसकट, नंतर तत्त्वतः असे शब्द फिरविले. आता गारपिटीची मदत देतानाही कंजुषी केली जात आहे. सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिकाच संशयास्पद आहे. सरकारने शेतकऱ्यांना संपण्यासाठी प्रयत्न केले तर त्याची किंमत मोजावी लागेल,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT