औरंगाबाद : जलसंपदा विभागात नव्याने नियुक्‍ती मिळालेल्या अभियंत्यांसह जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे.
औरंगाबाद : जलसंपदा विभागात नव्याने नियुक्‍ती मिळालेल्या अभियंत्यांसह जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे. 
मुख्य बातम्या

सीएसआर फंडातून कालवा दुरुस्तीवर विचार : शिवतारे

Santosh Munde

पैठण, जि. औरंगाबाद : कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारकडे निधी उपलब्ध नाही, हे मान्य आहे. परंतु दुरुस्तीसाठी निधी उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न असून सीएसआर फंडाच्या माध्यमातून जलयुक्‍त शिवार योजनेप्रमाणे कालवा, चाऱ्या, पोटचाऱ्यांची दुरुस्ती करता येईल का, याचाही विचार सुरू असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

पैठण तालुक्‍यातील जायकवाडी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी श्री. शिवतारे गुरुवारी (ता. २८) पैठणला आले होते. त्यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. श्री. शिवतारे म्हणाले, तब्बल नऊ वर्षानंतर जायकवाडी धरण भरले आहे. त्याची पाहणी तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अडचणी समजून घेतल्या.

धरणाचे दोन्ही कालवे नादुरुस्त आहेत, पोटचाऱ्याही उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यामुळे दुरुस्ती केल्याशिवाय हे वापरणे शक्‍य नाही. म्हणून वॉर फुटिंगवर ही कामे केली जातील. मंगळवारी बैठकीत याबाबत बैठक घेऊन निधी अंतिम निर्णय केला जाईल. यासाठी सीएसआर फंडातून काम करता येईल का, याचा ही विचार केला जाईल.

पाणी असून शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही तर फायदा काय असा प्रश्न पडतोय. या आधी निधी न मिळाल्याने ही काम होऊ शकली नाहीत. निधी उपलब्धतेसाठी जी पाणीपट्टी बजेटला जाते त्याऐवजी ती त्या-त्या मंडळ स्तरावर उपलब्ध करून देत कालवा, चाऱ्या पोटचाऱ्या दुरुस्तीसाठी निधी वाढविण्याचा प्रयत्न आहे.

येत्या महिनाभरात त्यामधील त्रुटी दूर केल्या जातील. सोबतच दरसूचीही दुरुस्त केली जाईल. त्यामुळे निधी उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. कृष्णेच पाणी, कृष्णा भीमा स्थिरीकरण, याबाबत ही तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवणार. पंतप्रधान कृषी सिंचन योजना, नाबार्डचे कर्ज आदीच्या माध्यमातून प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी उभा करण्याचे प्रयत्न आहेत, अशे श्री. शिवतारे  म्हणाले.  

शाश्वत सिंचनासाठी पुढाकार घ्या जलसंपदा व जलसंधारण विभागातील तरुण अभियंत्यांनी ध्येय आणि काळाची गरज लक्षात घेऊन दुष्काळ निर्मूलनासाठी आणि शाश्वत सिंचनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. श्री. शिवतारे यांनी गुरुवारी (ता. २८) जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) मध्ये जलसंपदा विभागातील नवनियुक्‍त सहायक अभियंता श्रोणी २ आणि कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. श्री शिवतारे म्हणाले, नवनियुक्‍त अभियंत्यांनी तत्वाधिष्ठित व ‘मिशनमोड’मध्ये काम करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT