बुलडाणा: सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी पेरणीची पूर्व तयारी करीत आहेत. शेतीसाठी लागणारे खत, बी- बियाणे शेतकरी खरेदी करीत आहेत. याचा गैरफायदा काही कृषी केंद्र मालक दरवर्षी घेतात. जिल्ह्यातील कृषी केंद्र धारकांना त्यांच्याकडे असलेल्या खताचे दर व त्यांच्याकडे असलेला साठा याची नोंद असलेला फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. खरीप हंगामाचे दिवस जवळ आले आहे. बळीराजा कोरोनाच्या संकटकाळातही शेतीच्या पूर्व मशागतीमध्ये व्यस्त आहे. यावर्षी दमदार पावसामुळे रब्बी हंगामात चांगले पीक आले, तसेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही घेतली. पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे, खतांचा पुरवठा व्हावा, कुठलीही कमतरता पडू नये याकरिता डॉ. राजेंद्र शिंगणे खरीप आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यामध्ये यावर्षी सात लाख ३७ हजार ८५० हेक्टर जमिनीवर खरीप पेरणी होण्याची शक्यता असून याकरिता एक लाख ७५ हजार ६८० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर असून आजपर्यंत प्रत्यक्षात ३५ हजार २९४ टन खत मिळाले आहे. उर्वरित खत जुलै पर्यंत प्राप्त होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक खत मिळेल. तरी देखील काही कृषी केंद्र धारकांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते. त्यामुळे कृषी केंद्र धारकांनी खताचे दर आणि उपलब्ध असलेला साठा याचा फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. जर शेतकऱ्यांकडून खतासाठी अतिरिक्त पैसे घेतल्यास संबधित कृषी धारकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.