मुख्य बातम्या

शेतकऱ्यांसाठी काम करताना जीव तर जाणार नाही ना? : केंद्रेकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे: शेतकऱ्यांना ठिकठिकाणी लुटले जातेय. त्यामुळे त्यांना मदत करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. त्यांच्यासाठी काम करताना जीव तर जाणार नाही ना? सैनिकाएवढे अवघड काम आहे कां?, असे प्रश्‍न करत राज्याचे कृषी आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी यंत्रणेचे कान टोचले. 

केंद्रेंकर यांनी नुकतीच कोल्हापूर विभागातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. दुष्काळी माण तालुक्‍यापासून त्यांनी आढाव्याला सुरवात केली. माती परीक्षण केलेय कां, असा प्रश्‍न विचारल्यावर काहींनी पुर्ण झाले नसल्याचे सांगितले. त्यावर केंद्रेकर म्हणाले, नेहमीची कामे पुर्ण झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत आपण केलीच पाहिजे. हे काम केले म्हणून जीव जाणार नाही? कृषी विभाग बंद पडला तर शेतकऱ्यांच्या जीवनात काही पडणार नाही. कृषी विभागाच्या पोटावर मात्र पाय येईल, हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांसाठी वेगळे काही करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार करु नका. भ्रष्टाचाऱ्यांना मी पाठिशी घालणार नाही. शेतकरी कोणत्या परिस्थितीत काबाडकष्ट करत असतो, याची नेहमी जाणीव ठेवा, असेही केंद्रेकर म्हणाले. 

सातारा तालुक्‍यातील भ्रष्टाचाराच्या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT