कृषी विद्यापीठे कामामुळे ओळखली जातात ः डॉ. वार्ष्णेय
कृषी विद्यापीठे कामामुळे ओळखली जातात ः डॉ. वार्ष्णेय 
मुख्य बातम्या

कृषी विद्यापीठे कामामुळे ओळखली जातात ः डॉ. वार्ष्णेय

टीम अॅग्रोवन

पुणे ः ‘‘कुठलेही कृषी विद्यापीठ, महाविद्यालय हे तेथील व्यक्तीने केलेल्या कामांमुळे ओळखली जातात. आतापर्यंत अनेक माणसे घडून कृषी विद्यापीठांतून बाहेर पडली आहेत. येथूनही असेच अनेक विद्यार्थी बाहेर पडले आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा इतिहास देशात ओळखला जातो. अशीच स्थिती परदेशात असून अनेक कृषी विद्यापीठे हे तेथील कामांमुळे देशभर ओळखली जातात’’, असे मत आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय यांनी व्यक्त केले.    

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ २०१८-१९ हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त पुणे कृषी महाविद्यालयात मंगळवारी (ता. २६) सुवर्णमहोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. त्या वेळी श्री. वार्ष्णेय बोलत होते. 

या वेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी, आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विनायक पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, फुलोत्पादन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, कृषी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, पुणे कृषी महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता रामचंद्र साबळे, डॉ. दशरथ ठवाळ, डाॅ. अजितसिंह चंदेले, एन. डी. पाटील, डॉ. भीमराज उल्मेक, डॉ. ए. आर. कराळे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी संशोधन संचालक डाॅ. विनय सुपे, डॉ. खाशेराव गलांडे आदी उपस्थित होते. 

डॉ. वार्ष्णेय म्हणाले, ‘‘आपण ज्या संस्थेत शिकलो त्याच संस्थेतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त होतो, त्याचा वेगळाच आनंद असतो.’’

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी म्हणाले, ‘‘मी १९६० पर्यंत पुणे कृषी महाविद्यालयात होतो. त्यानंतर दापोली, परभणी येथे कुलगुरू होतो. त्यामुळे शिकण्याची व शिकवण्याची सर्व हौस माझी झाली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट शिकली पाहिजे. कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन संपले पाहिजे, हे कृषी विस्तार शिक्षणाचे लक्षण आहे.’’

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर म्हणाले, की संधीचे सोने केले पाहिजे. आम्हाला संधी मिळाली म्हणून १९९४ पर्यंत संशोधन केले. ते सक्षमपणे कामे केले. त्यामुळे ४३ शास्त्रज्ञांना परदेशातील शिक्षणासाठी पाठविता आले. मात्र, १९९० पर्यंत संशोधन उच्च पातळीवर होते. त्यानंतर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे कृषी विद्यापीठाचा दर्जा वाढला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सूर्यवंशी यांनी केले. कृषी विस्तार प्रा. डॉ. सुभाषचंद्र शिंदे यांनी आभार मानले.

‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महाराष्ट्राच्या समितीने प्रत्येक विभागासाठी अडीचशे पानी अहवाल तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी होईल तेव्हा होईल. परंतु, त्याअगोदर कृषी शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या शेतीचे उत्पन्न प्रत्येक वर्षी १५ ते २० टक्क्यांनी वाढवून पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याकरिता पुढाकार घ्यावा.’’ - डॉ. के. पी. विश्वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT