पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन  ः साबळे
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन ः साबळे 
मुख्य बातम्या

पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन ः साबळे

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात पिकांचे नुकसान होऊनही प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरपाई देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी वेळीच दखल घेत शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव आणि जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी दिला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना या विषयावरील निवेदन पाठविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात आली. तरी फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा योजनेअंतर्गत भरपाई मिळावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकाश साबळे यांनी दिला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT