अकोली जहाॅंगीर येथे शेतकरी संघटनेचे आंदोलन
अकोली जहाॅंगीर येथे शेतकरी संघटनेचे आंदोलन 
मुख्य बातम्या

जैवतंत्रज्ञानासाठी शेतकरी संघटनेचे थेट शेतात आंदोलन

टीम अॅग्रोवन

अकोली जहॉँगीर, जि. अकोला  ः जैव तंत्रज्ञानाचे देशात पुन्हा प्रयोग सुरू झाले पाहिजेत, या मागणीसाठी सोमवारी (ता. १०) शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील अकोली जहाँगीर येथे एचटीबीटी कापूस व वांगे लागवड करीत अभिनव आंदोलन केले. १५०० शेतकऱ्यांनी या वेळी पाठिंबा दिला.

संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, वामनराव चटप, ललित बहाले, सीमा नरोडे, शैलजा देशपांडे, अजित नरदे, प्राध्या बापट, गुणवंत पाटील, सतीश दानी, सतीश देशमुख, बरुन मित्रा, श्री कुमार, चिरंजीवलाल बंसोई, शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख धनंजय मिश्रा, विदर्भ युवा आघाडीप्रमुख डॉ. नीलेश पाटील, सोशल मीडियाप्रमुख विलास ताथोड, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, तंत्रज्ञान जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार, नीलेश नेमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनाला राज्यभरातून शेतकरी उपस्थित होते.

देशातील पर्यावरण अतिरेक्यांच्या दुराग्रहामुळे जैव तंत्रज्ञानाचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. वारंवार विनंत्या करूनही सरकारने या मार्गातील अडथळे दूर केले नसल्याने जैव तंत्रज्ञानाचे प्रयोग पुन्हा सुरू व्हावेत, या शेतकऱ्यांच्या आग्रहाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन छेडल्याचे संघटनेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. 

नियोजनानुसार सोमवारी अकोट तालुक्यातील आकोली जहाँगीर येथे एचटीबीटी कापूस व वांगे लागवडीचा कार्यक्रम झाला. या वेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित बहाळे यांच्या शेतात प्रतीकात्मक आंदोलन झाले. या वेळी पोलिस तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लागवड केलेल्या बियाण्यांचे पोलिस व कृषी कर्मचारी यांनी नमुने काढले. हे नमुने प्रयोग शाळेत पाठविले जातील. ‘‘हे योग्य आले तर पुढील कारवाई करू,’’ असे अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठानेदार ज्ञानोबा फड यांनी सांगितले.

बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी तसेच एचटीबीटी तंत्रज्ञानाबद्दल माहिती असलेल्या तज्ज्ञांनी उपस्थित हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. हे तंत्रज्ञान शेतकऱ्याला मिळू न देण्याचे कटकारस्थान शासनकर्त्यांनी वर्षानुवर्षे राबविले आहे. मात्र या तंत्रज्ञानामुळे कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान न होता फायदाच होऊ शकतो, असे असतानाही ते त्याला मिळू नये असे कायदे या देशात तयार झाले आहेत. शासनाने हे कायदे रद्द करून एचटी वांग्याचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी या कार्यक्रमातून करण्यात आली.

ही लढाईची सुरवात या आंदोलनाच्या अनुषंगाने बोलताना माजी आमदार वामनराव चटप म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हितासाठी ही तंत्रज्ञानाची लढाई सुरू झाली आहे. आजचे आंदोलन प्रतीकात्मक असते तरी, आता मी माघार घेणार नाही. शेतकऱ्यांना हवे असलेले तंत्रज्ञान शासनाने त्याला दिले पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही आता मागे येणार नाही, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT