कृत्रिम पाऊस
कृत्रिम पाऊस  
मुख्य बातम्या

दोन दिवसांपासून सोलापूरवरून कृत्रिम पावसासाठी हालचाली

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : कृत्रिम पावसासाठीचे विमान दोन दिवसांपासून सोलापूरला हलविण्यात आले आहे. तेथूनच मिळणाऱ्या सूचनेनुसार कृत्रिम पावसाठीच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  पावसाची ओढ दिलेल्या भागात पावसासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला. विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर ४ ऑगस्टला डॉपलर रडार बसविण्यात आले. आठ ऑगस्टला रडारची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर कृत्रिम पावसाचा प्रयोगहो नाही म्हणत नऊ ऑगस्टपासून मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू झाले. त्यासाठी पहिल्यांदा व नंतर आलेल्या विमानाची आकाशात उड्‌डाने झाली. या प्रयोगात प्रयोगासाठी वापरण्यात आलेल्या फ्लेअर्सच्या माध्यमातून विविध ठिकाणी आकाशात पावसायोग्य ढगांवर मिळालेल्या रडारकडून मिळालेल्या सुचनांच्या आधारे बिजारोपणही करण्यात आले. परंतू या प्रयत्नातून नेमका किती ठिकाणी व किती प्रमाणात पाऊस पडणे शक्‍य झाले याची अधिकृत आकडेवारी तूर्त यंत्रणेकडे नाही.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी (ता. ७) औरंगाबाद येथे होणाऱ्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगाचे विमान सोलापूरच्या विमानतळावर हलविण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या ठिकाणावरूनच रडारच्या माध्यमातून मिळणाऱ्या ढगांवर पावसासाठी बीजारोपनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्र म्हणाले. मराठवाड्यात पावसाची ओढ कायम आहे. मराठवाड्यातील सात तालुक्‍यात आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाउस झाला नाही. दुसरीकडे एकूण ७६ तालुक्‍यांपैकी ३० तालुक्‍यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्‍केही पाउस झाला नसल्याची स्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT