ग्रामपंचायत अर्ज भरण्याचा खर्च ५०० रुपयांवर
ग्रामपंचायत अर्ज भरण्याचा खर्च ५०० रुपयांवर 
मुख्य बातम्या

ग्रामपंचायत अर्ज भरण्याचा खर्च ५०० रुपयांवर

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन दोन दिवस झाले तरी अद्याप एकही ऑनलाइन अर्ज दाखल झालेला नाही. सर्व्हर डाउन व इतर समस्यांना अर्ज दाखल करणाऱ्या ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतींच्या भावी उमेदवारांना समोरे जावे लागत आहे.  हा अर्ज निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या संकेतस्थळावर दाखल करावा लागत आहे. त्यासाठी मालमत्तेची सविस्तर माहितीसह आधार कार्ड आदी प्राथमिक व काही तांत्रिक माहितीदेखील आवश्‍यक आहे. ती गोळा करताना काही उमेदवारांची दमछाक होत आहे. १० फेब्रुवारी ही ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. ऑनलाइन अर्ज दाखल केल्याशिवाय निर्देशित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ऑफलाइन अर्ज दाखल करता येत नाही. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट काढून अधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखल करावा लागतो, पण ऑनलाइन अर्जच दाखल होत नसल्याने तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्जच आलेले नसल्याची माहिती मिळाली.  जिल्ह्यात सध्या ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. चोपडा, जामनेर व अमळनेर तालुक्‍यातील अधिक ग्रामपंचायती असून, रावेर, जळगाव तालुक्‍यातील प्रत्येकी एक व तीन ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी सुमारे ४०० ते ५०० रुपये एवढा खर्च उमेदवाराला येत आहे. ऑनलाईइन अर्ज दाखल करणाऱ्या सायबर व ई- सेवा केंद्रचालकांकडे उमेदवारांची गर्दी होत आहे. १२ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी आहे, तर १५ रोजी माघार होईल. २५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, २६ ला मतमोजणी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT