चुनखडीयुक्त जमीन
चुनखडीयुक्त जमीन 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखड

Santosh Munde

औरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत चालला आहे. सेंद्रिय कर्बाची अनुपलब्धता हे जमिनिचा पोत खालाण्याचे महत्त्वाचे कारण आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरताही त्यामध्ये भर घालते आहे. सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे मराठवाड्याच्या मातीत मोठ्या प्रमाणात असलेल्या चुनखडने डोके वर काढले आहे.  मराठवाड्यातील एकूण पेरणीयोग्य जमिनीपैकी जास्त खोल काळ्या जमिनी १३%, मध्यम खोल काळ्या जमिनी ६३%, हलक्‍या उथळ जमिनी १४% टक्‍के आहेत. मराठवाड्यातील ४३ टक्‍के जमीन चुनखड असून नांदेड जिल्ह्यात चुनखड जमिनीचे प्रमाण सर्वाधिक ७७ टक्‍के इतके आहे. औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या पाच जिल्ह्यांत चुनखडयुक्‍त जमिनीचे प्रमाण ३२ ते ३९ टक्क्यांदरम्यान आहे. तर हिंगोली व जालना जिल्ह्यात ४४ टक्‍के जमीन चुनखड आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखड असलेल्या जमिनीच्या माती नमुन्याचे प्रमाण ८० ते ९० टक्क्‍यांपर्यंत असून जवळपास ३० ते ४० टक्‍के जमिनीचे माती नमुन्यात १० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त चुनखड असल्याचे आढळून आले आहे. यासोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील ९० टक्‍के माती नमुन्यात नायट्रोजनची कमतरता आढळून आल्याची माहिती जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली. जमिनीचा सामू साधारणपणे ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. औरंगाबाद जिल्ह्यातील ९५ टक्‍के माती नमुन्यांचा सामू ७.८ ते ८.३ दरम्यान तर गोदावरीचे बॅकवॉटर व खास करून खांब नदीकाठच्या जमिनीच्या माती नमुन्यात ८.५ च्या वर आढळून आल्याचे श्री. पाटील म्हणाले. मराठवाड्यातील ८२ टक्‍के जमिनी अल्कधर्मीय आहेत. मराठवाड्यातील जमिनीत नत्राचा निर्देशांक १.१७ असून तो गरजेपेक्षा कमीच आहे. मराठवाड्यातील सरासरी ५२ टक्‍के जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता असून जालन्यात सर्वाधिक ६७ टक्‍के जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात ५४ टक्‍के, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यात ४६ टक्‍के, लातूर जिल्ह्यात ५२ टक्‍के, औरंगाबाद व बीड जिल्ह्यात ५० टक्‍के तर नांदेड जिल्ह्यातील ४३ टक्‍के जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०. ७५ पेक्षा अधिक असल्यास पुरेसे असते; परंतु गेल्या दहा वर्षांत ते ०.५ पर्यंत कमी झाले आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी झाली आहे. पाण्याचा थोडा जरी ताण पडला तरी पिके सुकू लागतात. जिवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे पिकांना पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये मिळत नाहीत. मराठवाड्याच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, गंधक, जस्त, लोह, बोरॉन या सहा अन्नद्रव्यांचीही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. जमिनीतून अन्नद्रव्यांचा उपसा वाढला; परंतु त्या प्रमाणात अन्नद्रव्ये टाकली जात नाहीत, त्यामुळे जमिनिची सुपिकता टिकून राहिली नसल्याचेही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या निष्कर्षात समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते जमिनीची सुपिकता कमी होण्याची कारणे

  • अतिवृष्टीमुळे होणारी जमिनीची धूप
  • सेंद्रिय पदार्थांचा नगण्य वापर
  • रासायनिक खतांचा असंतुलित वापर
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तसेच हिरवळीच्या खतांचा अल्प वापर
  • हे करता येईल

  • जमिनीची सुपिकता वाढविण्यासठी सेंद्रिय अन्नघटक वाढविणे गरजेचे आहे.
  • हिरवळीची खते, पालापाचोळ्याचे खत, पिकांचे अवशेष, गांडूळ खत, जैविक खते, साखर कारखान्यांतील ऊस मळीचा वापर करण्याची गरज.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT