ई-नाम
ई-नाम 
मुख्य बातम्या

ई-नामद्वारे ३७ लाख क्विंंटल शेतमालाचा ऑनलाईन लिलाव

टीम अॅग्रोवन

पुणे ः बाजार समित्यांमधून शेतमालाच्या आॅनलाईन लिलावासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या आॅनलाईन राष्‍ट्रीय ॲग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) अंतर्गत राज्यात सुमारे १ हजार कोटींच्या ३७ लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाईन लिलाव झाला, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  राज्यात सध्या ६० बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रणाली कार्यान्वीत आहे. श्री. पवार म्हणाले, की राज्यात केंद्र शासन पुरस्कृत दोन टप्प्यांमध्ये ६० बाजार समित्यांचा समावेश ई-नाम मध्ये करण्यात आला आहे. ई-नामसाठीच्या तांत्रिक पायाभूत सुविधांसाठी प्रत्येक बाजार समितीला केंद्र शासनाकडून ३० लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला असून, टप्प्याटप्प्याने विविध बाजार समित्यांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. जानेवारीअखेर ५५ बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव सुरू झाले असून, ३७ लाख क्विंटल अन्नधान्याचा आॅनलाईन लिलाव झाला आहे. या माध्यमातून सुमारे १ हजार कोटींची उलाढाल झाली असून, शेतकऱ्यांना हे पैसे आॅनलाईन पद्धतीने देण्यात आले आहेत. शेतमालाच्या गुणवत्तेच्या पृथ्थकरणासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून, ४७ प्रयोगशाळा कार्यान्वत झाल्या आहेत.

१४५ बाजार समित्यांत राज्य ‘ई-नाम’ करणार केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील १४५ बाजार समित्यांमध्ये ई-नाम प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठीचा प्रत्येक बाजार समितीसाठीचा ३० लाखांचा निधी जागतिक बॅंकेच्या स्मार्ट प्रकल्पाद्वारे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सुनील पवार यांनी सांगितले.   टप्पा १ ः सप्टेंबर २०१७ पासून

  •    ३० बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन लिलाव सुरू. 
  •    ३४.४४ लाख क्विंटल शेतमालाचा आॅनलाईन लिलाव.
  •    लिलावाचे ९८० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना अदा. 
  •    शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ३० बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब कार्यान्वित.
  •    ३० बाजार समित्यांमध्ये असेईंग सुरू, एकूण १,२८,७६८ लॉटस्चे असेईंग.
  •    २८ बाजार समित्यांमध्ये ई-पेमेंट सुरू, ३० कोटी ३७ लाख रुपये वितरीत
  •    शेतकरी नोंदणी ः ५,५५,४४४
  •    खरेदीदार (व्यापारी) नोंदणी ः ७,५२१
  •    आडते नोंदणी ः ६,८३९
  • टप्पा २ ः एप्रिल २०१८ पासून

  •    ३० बाजार समित्यांमध्ये शेतमालाची गेट एन्ट्री सुरू.
  •    २५ बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात ई-ऑक्शन सुरू. 
  •    ३.६६ लाख क्विंटलच्या शेतमाल लिलावातून शेतकऱ्यांना १०४ कोटी वितरीत. 
  •    शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी ३० बाजार समित्यांमध्ये असेईंग लॅब सुरू.
  •    १७ समित्यांनी असेईंग सुरू केले आहे. एकूण ३०१२ लॉटस्चे असेईंग.
  •    तकरी नोंदणी ः ३ लाख ६० हजार २९
  •    खरेदीदार नोंदणी ः ६  हजार ६३६
  •    आडते नोंदणी ः ४ हजार ७३१
  • प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वाधिक ग्रामसभा ई-नामच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांमधून जनजागृती करण्याचे आदेश केंद्र शासनाने बाजार समित्यांना दिले होते. त्यानुसार ६० बाजार समित्यांनी १ हजार ८१ ग्रामसभांचे आयोजन केले होते. यामध्ये ६५ हजार ८८३ शेतकरी सहभागी झाले होते. ग्रामसभांची संख्येचा राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT