30% grape pruning completed in Sangli
30% grape pruning completed in Sangli 
मुख्य बातम्या

सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्ण

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस गेल्या पंधरा दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. गेल्या आठवड्यात पाऊस सुरू होता, त्यामुळे फळछाटणी लांबणीवर पडेल, अशी शक्यता होती. परंतु पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के फळछाटणी झाली असल्याचे माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात द्राक्षाचे सरासरी सव्वा लाख एकर क्षेत्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना विषाणूचे संकट सुरूच आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागेचे काटेकोर नियोजन करून उत्पादन घेतले आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामासाठी दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण नियोजन करत फळ छाटणीस सुरुवात केली आहे. जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून छाटणीस प्रारंभ झाला आहे.

या वर्षी आटपाडी तालुक्यात आगाप फळ छाटणीस अगोदर सुरुवात झाली असून, त्यापाठोपाठ मिरज तालुक्याचा पूर्व भागातील शेतकऱ्यांनी फळ छाटणीस प्रारंभ केला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे द्राक्ष फळछाटणी लांबणीवर पडेल, अशी शक्यता होती. परंतु पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी फळ छाटणीचे धाडस केले.चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मिरज तालुक्यापासून फळछाटणीस प्रारंभ होईल. त्यानंतर हळूहळू सर्वत्र फळ छाटणीस गती येणार आहे.

जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फळछाटणीस प्रारंभ केला आहे. आतापर्यंत सुमारे ३० टक्के फळछाटणी पूर्ण झाली आहे. वातावरण चांगले असल्याने वेलीवर गर्भधारणा चांगली झाली आहे. उर्वरित क्षेत्रातील फळछाटणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. - चंद्रकांत लांडगे, अध्यक्ष, द्राक्ष बागायदार संघ, सांगली विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT