भात शेती
भात शेती  
मुख्य बातम्या

नदीने प्रवाह बदलल्याने कोंडयेत दोनशे एकर भातशेती धोक्यात

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेला आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसाने या गावामधून वाहणाऱ्या नदीने प्रवाहच बदलल्याने नदी थेट भातशेतीमधून वाहत आहे. सुमारे २०० एकर भात जमीन धोक्यात आली आहे. पावसाचा जोर कमी होऊनदेखील सध्या नदीचा बदललेला प्रवाह तसाच आहे. भातशेती लावणीची कामे पूर्ण झाली होती. पावसामुळे पीकही तरारू लागली आहेत. अशातच अतिवृष्टीमुळे नदीचा मूळ प्रवाह बदलला गेला असून, भातशेतीची वाताहत झाली. पंचनामे झालेत पण अजून नुकसानीची भरपाई इथल्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि या नदीतील गाळ उपसला जावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे कोंडये गावच्या सरपंच पूनम देसाई आणि डावखोलच्या सरपंचांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT