नाशिक जिल्ह्यात २ लाख मतदारांची वाढ
नाशिक जिल्ह्यात २ लाख मतदारांची वाढ 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात २ लाख मतदारांची वाढ

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात दोन महिने घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमध्ये तब्बल २ लाख ११ हजार ९१७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वाधिक २२,१७६ मतदार नोंदणी झाली आहे. नवमतदार नोंदणीत नाशिक हे मुंबई, ठाण्यानंतर राज्यात तिसऱ्या स्थानी आहे.

लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची जोरदार तयारी सुरू आहे. देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात मतदार याद्या पुनर्रीक्षण मोहीम राबविण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत ही मोहीम घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत निवडणूक शाखेने बीएलओंमार्फत (बूथ लेव्हल ऑफिसर) प्रत्येक मतदारसंघातील कुटुंबांना भेटी देत १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांचे अर्ज भरून घेतले. याशिवाय राजकीय पक्षांसह महाविद्यालये, वसतिगृह, सरकारी कार्यालये, एनजीओ, विविध संस्थांची या मोहिमेसाठी मदत घेतली.

जिल्ह्यातून दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी १० टक्के अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून भरण्यात आले आहेत. दरम्यान, एकूण दाखल अर्जांपैकी २ लाख ४ हजार ९१७ अर्जांच्या डेटा एन्ट्रीचे काम आयोगाच्या संकेतस्थळावर पूर्ण झाले आहे. सात हजार अर्जांची माहिती भरण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सर्वाधिक २२,१७६ अर्ज मालेगाव मध्य मतदारसंघातून दाखल झाले आहेत. त्या खालोखाल नाशिक पूर्वमधून १९,५३६ अर्ज आले आहेत. दरम्यान, नवमतदारांबरोबर मतदारयादीतून नाव वगळणे, पत्ता व नाव दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत निवडणूक शाखेने केलेल्या कामामुळे नाव व पत्ता दुरुस्तीचे अर्ज कमी दाखल झाल्याची माहिती निवडणूक शाखेचे तहसीलदार गणेश राठोड यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT