द्राक्ष उत्पादन
द्राक्ष उत्पादन  
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे १०० कोटी व्यापाऱ्यांकडे थकले

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या हंगामातील १०० कोटींपेक्षा जास्त रुपये परराज्यातील व्यापाऱ्यांकडे अडकले आहेत. उधारीवर द्राक्षे घेऊन गेलेल्या ४०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी दिलेले शेकडो धनादेश वठलेले नाहीत. यातील काही व्यापाऱ्यांचे मोबाईल गेल्या तीन महिन्यांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. मोबाईल चालू असणारे व्यापारी शेतकऱ्यांचा दूरध्वनी घेतच नाहीत. स्थानिक एजंटांनीही हात वर केले आहेत. पोलिस ठाण्यात शेकडो तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. द्राक्षांचे पैसे मिळणार की नाही या काळजीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.   दरवर्षी एक हजारांच्या आसपास व्यापारी जिल्ह्यात येतात. एखाद - दुसऱ्या शेतकऱ्याची द्राक्षे रोखीने खरेदी केली जातात. शेतकऱ्यांचा विश्वास बसल्यानंतर केवळ ५०० ते २००० रुपये इसार देऊन लाखो रुपयांची द्राक्षे व्यापारी उधारीवर घेऊन गेले आहेत. पंधरा दिवस ते एक महिनाभरात शेतकऱ्यांना पैसे देण्याचा वायदा व्यापाऱ्यांनी केला होता. दरम्यानच्या काळात हा ‘विश्वास’ अबाधित राहावा, यासाठी व्यापाऱ्यांनी एकतर कोरे किंवा लाखो रुपयांची रक्कम लिहिलेले शेकडो धनादेश शेतकऱ्यांना दिले आहेत. द्राक्ष काढणी हंगाम सुरू होता तोपर्यंत सर्व व्यापारी शेतकऱ्यांना थोडी थोडी रक्कम देऊन त्यांची बोळवण करीत होते. हंगाम झाल्यावर व्यापाऱ्यांनी आता मात्र पळ काढला आहे. पैसे अडकलेले सर्व शेतकरी आता व्यापाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून पैसे मागत आहेत. मात्र, व्यापारी शेतकऱ्यांना जुमानत नाहीत. या प्रकाराला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून मिळालेले धनादेश बँकेत भरले आहेत. बहुसंख्य धनादेश खात्यावर पैसे नसल्याने वठलेले नाहीत. आता शेतकरी एजंटाकडे खेटे घालत आहेत. मात्र त्यांनीही हात वर केले आहेत. बाजार समित्या उदासीन द्राक्षबागायतदारांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. परंतु, बाजार समित्यांची भूमिका उदासीनतेची आहे. बेदाण्यातून महसूल मिळत असल्याने सर्वच बाजार समित्यांनी कार्यक्षेत्र बेदाण्यापुरतेच मर्यादित ठेवले आहे. कोणत्याही द्राक्ष व्यापाऱ्यांची नोंद बाजार समित्यांकडे नाही. प्रतिक्रिया द्राक्षाला अधिक दर देतो असं सांगून व्यापारी शेतकऱ्यांना भुरळ घालतो. त्यामुळे शेतकरी त्यांना द्राक्ष विकतो. शेतकऱ्यांनी बाजार भावाने द्राक्ष विकली पाहिजे तरच फसवणूक थांबेल. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांची नोंदणी असेल तरच विक्री साठी पुढे आले पाहिजे. रोखीचा व्यवहार केला पाहिजे. - विनायक पाटील,  द्राक्ष उत्पादक,  वायफळे, ता. तासगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT