संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

लग्नासाठी पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीचा कायदा कायमस्वरूपी  करा ः संभाजी दहातोंडे

टीम अॅग्रोवन

नगर  ः कोरोना आजाराचे संकट व त्यामुळे करण्यात आलेला लॉकडाउनचा निर्णय अशा परिस्थितीत शासनाने तूर्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न करण्यात यावा, असे आदेश जारी केले आहेत. सध्या तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

श्री. दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या संकटकाळाची गरज म्हणून हा कायदा करण्यात आला आहे आणि नागरिकही या कायद्याची अंमलबजवणी करत केवळ ५० किंवा त्यापेक्षा ही कमी लोकांतही विवाह सोहळे पार पडत आहेत. एकट्या नगर जिल्ह्यात एक हजारांहून अधिक विवाह या पद्धतीने झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षे भव्य दिव्य लग्न सोहळा करणे हे एक प्रथा झाली. खोटया प्रतिष्ठेसाठी अनावश्यक नसणाऱ्या गोष्टींवर लाखो रुपये खर्च होत होता. त्यामुळे सामान्य लोक यात भरडले जातात व कर्ज बाजारी होतात. सरकारने सध्या घालून दिलेल्या नियमात विवाह होताहेत, त्याबद्दल सध्या तरी कुणी तक्रार नाही. त्यामुळे सरकारने सध्याच्या नियमांचे कायद्यात रूपांतर करावे. त्याची कडक अंमलबजवणी करावी. ज्या नागरिकांना पन्नासहून अधिक लोक लग्नासाठी आणायचे असतील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी व पन्नासहून अधिक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक हजार रुपये आकारणी करण्यात यावी व ही रक्कम दरवर्षी जिल्हास्तरावर शासनाने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून त्यासाठी खर्च करावी, असे दहातोंडे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT