नगर ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवत सरकारने २०१६ ते २०१९ दरम्यान वृक्षलागवड मोहीम राबवली. त्यानंतर आता वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानाची सुरुवात आगामी वर्षापासून होणार आहे. या अभियानात राज्यात २०२० ते २०२४ दरम्यान प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यामध्ये नाशिक विभागाला पहिल्या टप्प्यात ७१ लाख पाच हजार २०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे अभियान २०१६ ते २०१९ दरम्यान राबविण्यात आले आहे. आता आगामी वर्षापासून वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी राज्यात केली जाणार आहे. या अभियानांतर्गत २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी १० कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. राज्यातील वनक्षेत्र मर्यादित असल्याने वृक्षलागवडीस तिथे कमी वाव आहे. वनेतर क्षेत्रामध्ये वृक्षलागवडीस मोठ्या प्रमाणात चालना देणे आवश्यक आहे.
ही बाब विचारात घेऊन, पाच कोटी वृक्षलागवड वन विभागाच्या माध्यमातून, तर उर्वरित पाच कोटी वृक्षलागवड ग्रामपंचायतींसह राज्याचे सर्व प्रशासकीय विभाग, तसेच केंद्र शासनाच्या राज्यातील आस्थापनांच्या माध्यमातून करण्याचे प्रस्तावित केले आहे. नाशिक विभागाअंतर्गत ७१ लाख पाच हजार २०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. असे आहे जिल्हानिहाय उद्दिष्ट
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.