भुकेल्या स्थितीत गोगलगायी पत्करतात अधिक धोका 
मुख्य बातम्या

भुकेल्या स्थितीत गोगलगायी पत्करतात अधिक धोका

वृत्तसेवा

गोगलगायी भुकेल्या असताना अधिक धोका पत्करत असल्याचे इंग्लंड येथील ससेक्स विद्यापीठात केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे धोका पत्करण्याचे प्रमाण त्यांच्या तग धरण्याच्या संभाव्य शक्यताही कमी करत असल्याचे त्यात आढळले आहे. हे संशोधन ‘सायन्स अॅडव्हान्सेस जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. खरीप हंगामामध्ये ओलसर वातावरणामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव विविध पिकांमध्ये वाढतो. अनेक पिकांमध्ये नुकसानीचे प्रमाण प्रचंड असते. अन्य सजीवाच्या तुलनेमध्ये या मृदूकाय सजीवाची मेंदूची रचना सोपी आहे. त्यामुळे या सजीवाचा वापर मेंदूमधील विविध घटकांच्या अभ्यासासाठी प्रारूप म्हणून केला जातो. असाच एक प्रयोग इंग्लंड येथील ससेक्स विद्यापीठातील प्रो. जॉर्ज केनेनेस, प्रो. केविन स्टारास आणि डॉ. मायकेल क्रॉसले यांनी तळ्यातील गोगलगायींवर केला होता. या प्रयोगांमध्ये गोगलगायी आत्यंतिक भुकेच्या स्थितीमध्ये अधिक धोका पत्करत असल्याचे दिसून आले आहे. संशोधकांच्या गटाने प्राण्यांच्या तग धरण्यासाठी वर्तनामध्ये होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आहे. आत्यंतिक भुकेच्या स्थितीमध्ये सामान्य स्थितीमध्ये संपूर्णपणे टाळत असलेल्या, पर्यायाने त्यांच्या शरीरासाठी हानिकारक असलेल्या घटकही सजीव खातात. अशा धोकादायक स्थितीमध्ये मेंदूमध्ये होणाऱ्या क्रियांचे मापन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने केले आहे. या वेळी मेंदूमध्ये स्त्रवणाऱ्या विविध रसायनांची विचार करण्यात आला. प्रो. केविन स्टारास यांनी सांगितले, की कोणत्याही प्राण्याला जगताना तग धरणे आणि धोक्याचे संतुलन करणे या दोन्ही बाबींसाठी सातत्याने निर्णय घ्यावे लागते. असामान्य स्थितीमध्ये तलावातील गोगलगायी कशाप्रकारे वागतात, याचा अभ्यास केला गेला. त्यामुळे अधिक गुंतागुंतीची संरचना असणाऱ्या प्राण्यांच्या निर्णयाबाबत अंदाज मिळवणे शक्य होणार आहे. कोणता घटक खायचा आणि खायचा नाही, याविषयी सजीवाला सातत्याने निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी मेंदूतील एक विभाग सातत्याने कार्यरत असतो. प्रो. केनेनेस, प्रो. स्टारास आणि डॉ. क्रॉसले यांनी भरपूर खाद्य खालेल्या आणि भुकेल्या गोगलगायींच्या मेंदूतील हा विभाग ओळखला. या क्रियेच्या वेळी कार्यरत डोपामाईन असणाऱ्या चेतातंतूमध्ये बदल करण्यात आले. या चेतातंतूचे काम थांबवून प्रयोग केले. या संशोधनासाठी जैवतंत्रज्ञान आणि जैवशास्त्र संशोधन परिषदेने अर्थसाह्य केले आहे. या प्रयोगाचे फायदे

  • कृषी क्षेत्रामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव ही एक समस्या आहे. एकदा विविध स्थितीमध्ये खाद्यविषयक वर्तनामध्ये होत असलेल्या बदलांविषयी अधिक ज्ञान उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा पीक संरक्षणासाठी विविध उपाय राबविण्यासाठी होऊ शकतो.
  • गोगलगायीपेक्षा अधिक गुंतागुंतीची संरचना असलेल्या प्राण्यांविषयीही यातून अंदाज मिळू शकतो.
  • आत्यंतिक दुष्काळाच्या स्थितीमध्ये माणसांना तग धरण्यासाठी अशा संशोधनातून फायदा होऊ शकतो. दुष्काळाच्या स्थितीमध्ये माणसांनी विविध गवते, पाला, झाडाच्या साली आणि अगदी कातड्याचे बेल्टही शिजवून खाल्ल्याची उदाहरणे दिली जातात. यातील अनेक घटक माणसांच्या आहारात कधीही न घेतले जाणारे असू शकतात. त्याचे आरोग्यावर अगदी प्राणघातक परिणाम होऊ शकतात.  
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fish Processing Business: मत्स्य प्रक्रिया व्यवसायासाठी क्लाउड किचन, फूड ट्रक

    Flower Fertilizer: निर्माल्यातून तीन टन खतनिर्मिती

    Maharashtra Farmer Issue: पीक नुकसानीच्या पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची आत्महत्या

    Rice Farming: पावसामुळे भातशेती बहरली

    Rainfall Impact: पर्जन्यमापकाच्या कचाट्यात सापडला शेतकरी

    SCROLL FOR NEXT