Cotton
Cotton Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: यंदाही कापसाला विक्रमी भाव मिळणार का?

टीम ॲग्रोवन

यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे कापसाला विक्रमी भाव (Cotton Rate) मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पुढच्या काही महिन्यांत कापसाला वाढीव दर (Cotton Market Rate) मिळेल, असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांनी कापूस रोखून धरला आहे. शेतकरी कापसाचा मोठ्या प्रमाणावर साठा करत आहेत. ते टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे यंदा उत्पादन (Cotton Production) वाढण्याचा अंदाज जाहीर होऊनही निर्यात मात्र थंडावलेली दिसतेय.

बाजारात कापसाची आवक वाढत नसल्याने दर चढे आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील किंमतपातळी विचारात घेता भारतीय कापूस महाग पडतोय. त्यामुळे निर्यात किफायतशीर ठरत नाहीयै. ‘‘ कापसाच्या नवीन पिकाची वेचणी गेल्या महिन्यात सुरू झाली. परंतु शेतकरी माल विकायला उत्सुक नाहीत. गेल्या वर्षीप्रमाणे कापसाला जादा भाव मिळेल, या आशेने त्यांनी माल साठवून ठेवलाय, '' असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले.

शेतकऱ्यांना गेल्या हंगामात विक्रमी भाव मिळाला. परंतु यंदा तसा भाव मिळण्याची स्थिती नाही. देशातील कापूस उत्पादनात वाढ झाली असून जागतिक बाजारपेठेत भाव खाली आले आहेत, असे गणात्रा यांनी सांगितले. जूनमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळाला होता. त्यावेळी जागतिक बाजारपेठेतही दर चढे होते. परंतु आता जूनच्या तुलनेत देशात कापसाच्या दरात ४० टक्के घट झाली आहे.

‘‘गेल्या वर्षी आम्ही कापूस ८ हजार रूपये क्विंटलने विकला. आणि नंतर मात्र भाव १३ हजार रूपयांवर गेला,'' असे गुजरातमधील शेतकरी बाबुलाल पटेल म्हणाले. ‘‘यंदा मात्र आम्ही ती चूक पुन्हा करणार नाही. आम्ही १० हजाराच्या खाली कापूस विकणार नाही,'' पटेल यांनी सांगितलं. यंदा कापूस उत्पादन जास्त राहील, असा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(सीएआय)चा अंदाज आहे. परंतु बाजारात सध्या सरासरीच्या तुलनेत एक तृतियांश आवक येत असल्याचं बाजारातील सूत्रांनी सांगितलं. भारतात यंदा ३४४ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज सीएआयने दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १२ टक्के अधिक आहे.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी १० हजार ते १५ हजार रूपयांना कापूस विकलाय. सध्या ९ हजार रूपये भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी कापूस विकत नाहीयैत. परंतु यंदा कापसात गेल्या वर्षी इतकी तेजी येण्याची शक्यता दिसत नाही, असे बाजारविश्लेषकांचे मत आहे. इंडियन कॉटन फेडरेशनचे सचिव निशांत अशीर यांनी सांगितले की, जगभरात वस्त्रोद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याने कापसाला मागणी घटली आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या कापसापैकी ५० टक्के कापूस बांगलादेशला जातो.

इतर खरेदीदार देशांमध्ये चीन, व्हिएतनाम, थायलंड आणि इंडोनेशिया यांचा समावेश होतो. बांगलादेश संकटाचा सामना करत असून तिथून कापसाला मागणी येत नाहीयै. तसेच तिथं पश्चिम आफ्रिका किंवा अमेरिकेतून तुलनेने स्वस्तात कापूस उपलब्ध होत आहे. भारतीय कापसाचा सध्याचा दर पाहता यंदाच्या हंगामात कापूस निर्यात फक्त २५ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे, असे अशीर म्हणाले.

एरवी ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत भारताची कापूस निर्यात जोरात असते. एकूण कापूस निर्यातीपैकी ६० ते ७० टक्के कापूस या काळात निर्यात होत असतो. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे, असे सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितलं. सीएआयच्या अंदाजानुसार यंदा कापूस निर्यातीत ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. यंदा ३० लाख गाठी कापूस निर्यात होईल, असा सीएआयचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ४३ लाख गाठी कापूस निर्यात झाला होता.

परंतु काही निर्यातदारांच्या मते मात्र कापूस निर्यायीत एवढी घट होणार नाही. निर्यात किमान गेल्या वर्षीइतकी तरी राहील किंवा किंचित जास्तच राहील, असं त्यांचं म्हणणं आहे. यंदा निर्यात ४५ ते ४८ लाख गाठी होईल, असं त्यांनी सांगितलंय. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार गुजरात आणि महाराष्ट्रात कापसाची स्थिती चांगली आहे.

शेतकऱ्यांनी यंदा माल मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलाय. दरवाढीच्या अपेक्षेने ते माल टप्प्याटप्प्याने बाजारात आणतायत आणि त्यामुळेच किंमतीवर आवकेचा दबाव दिसून येत नाही, असं विश्लेषण त्यांनी केलंय. दरम्यान काही व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये निवडणुका संपल्यानंतर डिसेंबरपासून कापसाची आवक वाढायला सुरूवात होईल. तर महाराष्ट्र आणि तेलंगणात येत्या काही दिवसांत आवक वाढेल, असं ते म्हणाले.

यंदाच्या हंगामात व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ७० हजार गाठी कापूस निर्यातीसाठी करार केले आहेत, अशी माहिती एका डिलरने दिली. गेल्या वर्षी याच कालावधीत पाच लाख गाठींहून अधिक कापासू निर्यातीसाठी करार झाले होते. यावरून यंदाच्या हंगामातली कापूस निर्यातीतली घसरण दिसून येते. जोपर्यंत स्थानिक बाजारातील कापसाचे दर कमी होत नाहीत किंवा जागतिक बाजारपेठेतील किंमती वाढत नाहीत तोपर्यंत निर्यातीला वेग येणं कठीण आहे, असे या डिलरने सांगितले. दरम्यान, यंदा कापसाचा किमान दर ९ हजार रूपये क्विंटल राहू शकतो. या किंमतपातळीवर नजर ठेऊन शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने माल विकला तर ते फायद्यात राहतील, असं बाजारविश्लेषकांनी सांगितलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT