Onion Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export : ‘सीमाशुल्क’च्या गोंधळामुळे कांदा निर्यात ठप्प

Onion Market : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी (ता. १३) कांदा निर्यातीवरील ५५० डॉलरची किमान निर्यात मूल्य तूर्तास हटविले तर वित्त मंत्रालयाने निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के केले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी (ता. १३) कांदा निर्यातीवरील ५५० डॉलरची किमान निर्यात मूल्य तूर्तास हटविले तर वित्त मंत्रालयाने निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के केले आहे. परिणामी कांदा निर्यात कामकाजात गती येणे अपेक्षित होते. मात्र सोमवारी (ता. १६) चौथ्या दिवशीही केंद्राच्या सीमा शुल्क विभागाची शुल्क प्रणालीमध्ये आकारणी संदर्भात सुधारित बदल न झाल्याने निर्यात कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे कांदा व्यापारी, निर्यातदार यांची डोकेदुखी वाढली आहे.

केंद्र शासनाने अधिसूचना आल्यानंतर निर्यात शुल्क आकारणीसंबंधी तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र सीमा शुल्क विभागाची केंद्रीकृत प्रणालीमध्ये सोमवारी (ता. १६) दुपारी ४ वाजेपर्यंत शुल्क आकारणीबाबत सुधारित बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे निर्यात संबंधित दस्तावेज व पुढील प्रक्रिया होत नसल्याने निर्यातदारांना मोठा आर्थिक व मानसिक फटका बसत आहे.

निर्यात कामकाजात वेळेवर कामकाज न झाल्यास नाशवंत शेतमाल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसू शकतो. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना सोसावा लागण्याची शक्यता आहे.

एकीकडे केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, निर्यातदार व शेतकऱ्यांना लाभ होईल असे बोलले गेले. सत्ताधाऱ्यांनी तसा दावाही केला; मात्र चार दिवस उलटूनही सीमा शुल्क विभागाच्या प्रणालीमध्ये शुल्क आकारणी संदर्भात बदल करण्यात न आल्याने त्याचा फटका बसतो आहे.

निर्यात बंदीची घाई; सुधारित कामकाजात दिरंगाई

ज्या वेळी कांदा निर्यातबंदीची घोषणा होते. त्यावेळी पुढील एक तासात सर्व कामकाज अधिसूचनेनुसार तत्काळ प्रभावाने निर्यातबंदी होते. मात्र अधिसूचनेत बदल झाल्यानंतर शुल्क कमी केल्यास किंवा ते रद्द केल्यानंतर त्याची कार्यवाही मात्र तत्काळ होत नसल्याचा अनुभव वारंवार निर्यातदारांना येत आहे.

चौथा दिवस उलटूनही अद्याप शुल्क आकारणीबाबत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे निर्यातदारांना मनस्ताप देण्याचा प्रकार केंद्र सरकारच्या माध्यमातून होतो आहे का? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तातडीने ही कार्यवाही करून वेळखाऊपणा टाळणे अपेक्षित होते. मात्र असे न झाल्याने फटका बसतो आहे.

सरकारकडून कांदा निर्यातबंदी केल्यानंतर अगदी तत्काळ प्रभावाने परदेशात जाणारा कांदा त्याचवेळी रोखला जातो. मात्र याच सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध हटवल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी नेहमीच दिरंगाई होते. आमचे सरकार हे गतिमान कारभार करणारे सरकार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात सरकारचे कांदा निर्यात धोरण हे कायमच शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानीचे ठरत ठरत आहे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT