Cotton Rate
Cotton Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Market : राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री रोखली

Team Agrowon

पुणेः देशातील कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया (The Cotton Association of India) अर्थात सीएआयनं (CAI) १० लाख गाठींनी कमी केला.

यंदा उत्पादन ३३० लाख गाठींवरच स्थिरावेल. मात्र देशातील कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्तच राहील. मात्र बाजारातील कापूस आवक (Cotton Arrival) खूपच कमी आहे.

त्यातच महाराष्ट्रातील बाजारात आवक नगण्य आहे, असं सीएआयनं म्हटलंय.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआने देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी केला.

डिसेंबरच्या अंदाजात सीएआयने देशातील कापूस उत्पादन जवळपास ३४० लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला होता.

मात्र जानेवारीच्या अंदजात उत्पादन ३३० लाख ५० हजार गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

सीएआयच्या मते, यंदा पंजाब, हरियाना आणि राजस्थान या राज्यांतील कापूस उत्पादन ८ लाख गाठींनी कमी होण्याचा अंदाज आहे.

पंजाब आणि हरियानात अनेक भागांमध्ये यंदा अति पावसाचा पिकाला फटका बसला. त्यामुळं उत्पादन घटलं. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही उत्पादन घटणार आहे.

मध्य प्रदेशातील उत्पादन २० लाख गाठींवर स्थिर राहील, असंही सीएआयचं म्हणणं आहे.

यंदा गुजरात आणि महाराष्ट्रातील कापूस उत्पादन वाढल्याचाही अंदाज सीएआयनं व्यक्त केला. गुजरातमध्ये मागील हंगामात ७६ लाख गाठी कापूस उत्पादन झालं होतं.

ते यंदा ९४ लाख गाठींवर पोचेल. तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादन मागील हंगामातील ७५ लाख गाठींवरून ८२ लाख गाठींपर्यंत वाढेल, असा अंदाजही सीएआयनं व्यक्त केला.

तसंच तेलंगाणामधील कापूस उत्पादन यंदा ९ लाख गाठींनी वाढून ४४ लाख गाठींवर पोचण्याची शक्यता आहे.

वापर ३०० लाख गाठींवर स्थिरावेल


सीएआयनं कापूस उत्पादनाचा अंदाज १० लाख गाठींनी व्यक्त केला. मात्र कापूस वापर कायम ठेवला.

सीएआयच्या मते देशात यंदा ३०० लाख गाठी कापसाचा वापर होईल. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत कापूस वापर १८ लाख गाठींनी घटणार आहे.

यंदाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये ६५  लाख गाठींचा वापर झाला, असंही सीएआयनं म्हटलंय.

महाराष्ट्रातील आवक कमी


कापसाचा हंगाम सुरु होऊन आता तीन महिन्यांचा कालावधी झाला. या तीन महिन्यांत देशातील बाजारात ८० लाख गाठी कापसाची आवक झाली.

पंजाब, हरियाना आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये १९ लाख गाठी कापूस बाजारात आला. तर गुजरातमधील शेतकऱ्यांनी २४ लाख गाठींची विक्री केली.

मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केवळ ११ लाख गाठी कापूस विकल्याचं सीएआयचं म्हणणं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT