Onion Market Agrowon
ॲग्रोमनी

Onion Market : केंद्र सरकार अडीच लाख टन कांदा खरेदी करणार; शेतकऱ्यांना फायदा होईल का?

लेट खरिप कांद्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघाला नाही. कांदा दराचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजला. संसदेतही खासदारांनी हा प्रश्न उचलून धरला.

Team Agrowon

Onion Rate : लेट खरिप कांद्याने यंदा दराचा वांदा केला. बाजारात आवकेचा दबाव असल्याने दरात मोठी घसरण झाली होती. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. आता लवकर लागवड झालेला रब्बी कांदाही बाजारात येत आहे.

रब्बी कांद्याची आवक एप्रिल आणि मे महिन्यात जास्त राहू शकते. तर दुसरीकडे नाफेडही कांदा खरेदीत उतरणार आहे.

लेट खरिप कांद्यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघाला नाही. कांदा दराचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजला. संसदेतही खासदारांनी हा प्रश्न उचलून धरला. तसेच सरकारने कांदा खरेदीचीही मागणी केली.

या उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सरकार कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले. सरकारने २.५० लाख टन कांदा खरेदीचा निर्णय घेतल्याचेही तोमर यांनी स्पष्ट केले.

नाफेडने २४ फेब्रुवारीपासून कांदा खरेदी सुरु केली. आत्तापर्यंत नाफेडने जवळपास १३ हजार टन कांदा खरेदी केल्याचेही कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले.

देशात यंदा रब्बी कांद्याचेही उत्पादन चांगले राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या लवकर लागवडीचा रब्बी कांदा बाजारात दाखल झाला. त्यामुळे लेट खरिपातील कांदा कमी होत असली तरी आवक जास्तच दिसते.

यंदा रब्बी कांद्यासाठीही पोषक हवामान होते. त्यामुळं उत्पादन चांगल होऊ शकतं, असं नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पंडित वाघ यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या पावसाचाही कांद्याला फटका बसला. पाणी लागलेला कांदा लवकर बाजारात येऊ शकतो.

कारण हा कांदा नंतर खराब होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा विकल्याशिवय पर्याय नाही. वाढती उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा कांदा टिकवणक्षमतेवर परिणाम होत आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसतो.

कांदा बाजाराची स्थिती

सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ९०० रुपये भाव मिळतोय. रब्बीतील कांद्याची टिकवणक्षमता जास्त आहे. त्यामुळं रब्बीतील कांद्याला आवकेच्या हंगामात कांदा एक हजार ते १२०० रुपयाने विकला जाऊ शकतो, असा अंदाज कांदा व्यापारी आणि निर्यातदारांनी व्यक्त केला.

पण हा दर उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहे. त्यामुळं सरकारनं रब्बी कांद्यालाही अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कांदा खरेदी सुरु केली. कांद्याचे दर पडल्याच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकार रब्बी हंगाम २०२३ मध्ये २.५ लाख टन खरेदी करणार आहे.
नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री
रब्बीच्या कांद्याचा चांगला उतारा येत आहे. रब्बी कांद्याची एप्रिल आणि मे महिन्यात जास्त विक्री होऊ शकते. नाफेड कांदा खरेदी करते, पण त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. नाफेडही कमी दरातच खरेदी करते. तसेच या कांद्याचा वापर दर पाडण्यासाठीच केला जातो.
पंडित वाघ, कांदा उत्पादक, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

SCROLL FOR NEXT