हरभरा, मसुरीवर अायात शुल्क लागू होणार
मुंबई ः पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के अायात शुल्क लागू केल्यानंतर अाता हरभरा अाणि मसूर अायातीवर ३० टक्क्यांपर्यंत शुल्क लागू करण्यासाठी केंद्राकडून हालचाली सुरू अाहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
देशात हरभऱ्याचे बंपर म्हणजेच १० दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता अाहे. त्यात देशात कडधान्यांची अायात सुरूच अाहे. यामुळे दरात घसरण होऊ नये म्हणून हरभरा अायातीवर शुल्क लागू केले जाणार अाहे.
यामुळे देशांतर्गत कडधान्यांच्या दराला बळकटी मिळण्यास मदत होणार अाहे. मसुरीची किमान अाधारभूत किंमत प्रतिक्विंटल ४,२५० रुपये निश्चित केली अाहे. मात्र सध्या किमान अाधारभूत किमतीपेक्षा २० टक्के कमी भावाने मसुरीची विक्री होत अाहे. या पार्श्वभूमीवर मसूर अायातीवर शुल्क लागू करण्याचा केंद्राचा विचार अाहे.
देशात धान्योत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, शेतीमालाच्या आयातीमुळे स्थानिक बाजारपेठातील दरावर परिणाम होत अाहेत. यामुळे शेतमालाच्या अायातीवर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत अाहे.