शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानावर अथांग जैन यांनी मांडल्या संकल्पना
शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानावर अथांग जैन यांनी मांडल्या संकल्पना 
ॲग्रोमनी

शेतीतील बदलत्या तंत्रज्ञानावर अथांग जैन यांनी मांडल्या संकल्पना

टीम अॅग्रोवन

जळगाव : भारत देश २०२२ मध्ये कसा असावा यासंदर्भात दिल्ली येथे निती आयोगातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशातील २०० तरुण उद्योजकांसाठी चॅंपियन ऑफ चेंज ही परिषद नुकतीच घेण्यात आली. या परिषदेत जळगाव येथील जैन फार्मफ्रेश फुड्‌स लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. अथांग जैन यांनी या परिषदेत ‘नवीन भारत ः २०२२’ या विषयांतर्गत शेतीतील बदलते तंत्रज्ञान व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करायचे प्रयत्न या संकल्पनेवर आपले मुद्दे मांडले.   त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चाही केली. या परिषदेत सॉफ्ट पॉवर, इनक्रेडिबल इंडिया, शिक्षण मनुष्यबळ विकास, आरोग्य, डिजिटल इंडिया आदी विषयांचा समावेश २०२२ मधील नवीन भारत या संकल्पनेत केला होता. जे उद्योजक व व्यावसायिक भारतात उद्योजकीय बदल, प्रगती घडवू शकतील, अशा तरुण उद्योजकांची निवड करण्याची जबाबदारी निती आयोगावर सोपविली होती. या अंतर्गत अथांग जैन यांची निवड झाली.  यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चॅंपियन ऑफ चेंजमध्ये सहभागी तरुण उद्योजकांना संबोधित केले. या परिषदेत अथांग जैन यांनी शेतीत बदल घडवून गरिबीचे निर्मूलन कसे करता येईल? शेतीसंबंधीच्या उत्पादकांचे मूल्यवर्धन करून उत्पन्न वाढेल, शेतकऱ्यांना लाभ होईल, यासंदर्भातील आपल्या संकल्पना मांडल्या. अथांग जैन हे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांचे पुतणे व अनिल जैन यांचे पुत्र आहेत. अथांग हे पद्मश्री भवरलाल जैन यांचे नातू असून, ते भवरलाल जैन यांचे विचार पुढे नेत आहेत. अथांग जैन यांनी तारुण्यातच राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परिषदेत सहभागी होऊन ध्येयधोरणांसंबंधी मुद्दे मांडले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT