अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर परिणाम
अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर परिणाम 
ॲग्रोमनी

अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर परिणाम

वृत्तसेवा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) छेडले गेले आहे. अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर जबर आयात कर लावले आहेत. अमेरिकेतून त्या वस्तूंची आयात बंद व्हावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालावर (कापूस, सोयाबीन इ.) २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापार युद्धाचा भारतीय बाजारपेठेवरही मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. कापूस

  • भारत हा अमेरिकेच्या खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकाचा कापूस उत्पादक देश आहे.
  • चीन दरवर्षी साधारण ५० लाख गाठी कापूस आयात करतो. त्यातील सुमारे ४० टक्के वाटा अमेरिकेचा.
  • चीनने अमेरिकेतून कापूस आयातीवर २५ टक्के शुल्क लावले आहे. 
  • त्यामुळे भारतासाठी चीनला कापूस निर्यात करण्याची मोठी संधी.
  • चीनमध्ये भारतातून आयात होणाऱ्या कापसावर कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे अमेरिकेच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त पडेल.
  • सध्या भारतातून चीनला सहा ते सात लाख गाठी कापसाची निर्यात. परंतु पूर्वी भारताने ४० लाख गाठींच्या घरात कापूस निर्यात केलेला आहे.
  •  सोयाबीन

  • चीन अमेरिकेकडून ९३४ लाख टन सोयाबीन आयात करतो.
  • व्यापारयुद्धामुळे ही आयात मार खाईल. तिथेही भारताला मोठी संधी आहे.
  • चीनने भारतीय सोयापेंड आयातीवर घातलेले निर्बंध उठवल्यास भारत चीनला मोठा पुरवठा करू शकतो.
  • निर्बंध उठवावेत म्हणून वाणिज्य मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू.
  • चीनमध्ये पशुखाद्य आणि कोंबडीखाद्यात वापरल्या जाणाऱ्या सोयापेंडचा पुरवठा करण्याची भारताला मोठी संधी.
  • तसेच चीन ज्या देशांना थोडक्या प्रमाणात सोयापेंड निर्यात करत होता त्या जपान, दक्षिण कोरिया व व्हिएतनामची बाजारपेठही भारताला खुली होण्याची शक्यता.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

    Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

    Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

    Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    SCROLL FOR NEXT