simple rainguage and sunshine recorder
हवामान घटकांमध्ये प्रामुख्याने ऊन, वारा, पाऊस, तापमान, ढग, सापेक्ष आर्द्रता व जमिनीचे तापमान इ. घटकांचा समावेश होतो. त्यातील पाऊस व सूर्यप्रकाश या दोन घटकांचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर होणारा परिणाम आणि हे घटक मोजण्याची उपकरणे आपण पाहू. पिकांच्या वाढीवर प्रामुख्याने हवामान घटकांचा (अजैविक घटकांचा) तर कीड आणि रोग या जैविक घटकांचा; तसेच भूपृष्ठ रचना, जमीन व जमिनीचा प्रकार या पर्यावरणीय घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो.हवामान घटकांमध्ये प्रामुख्याने ऊन, वारा, पाऊस, तापमान, ढग, सापेक्ष आर्द्रता व जमिनीचे तापमान इ. घटकांचा समावेश होतो. त्यातील पाऊस, सूर्यप्रकाश या दोन घटकांचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर होणारा परिणाम आणि हे घटक मोजण्याची उपकरणे आपण पाहू. पाऊस
पर्जन्यमान म्हणजेच पावसाच्या पाण्याचे प्रमाण आणि वितरण याचा परिणाम पिकावर होत असतो. पिकास उपलब्ध होणारे जमिनीतील पाणी (मृद बाष्पता) आणि वातावरणातील पाणी (सापेक्ष आर्द्रता) अवलंबून असते. याचे पिकावर चांगले वाईट परिणाम होत असता. उदा. जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे किंवा संततधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये मृद बाष्प व वातावरणातील सापेक्ष आर्द्रता हे दोन्ही प्रमाणापेक्षा अधिक राहिले. परिणामी मुगाचे पीक सुमारे पन्नास ते सत्तर टक्के वाया गेले. सोयाबीन, कापूस या पिकाची शाकीय वाढ अधिक होऊन प्रजोत्पादन वाढीस विलंब झाला आहे. सोयाबीनच्या पिकाची शाकीय वाढ अधिक होऊन पर्णभार जास्त झाला. (शेतकऱ्यांच्या भाषेत -पीक नुसते माजले). मात्र, प्रजोत्पादक किंवा लैंगिक वाढ होण्यासाठी वातावरण अनुकूलता लाभली नाही. यामुळे शेंगा लागण्याचे प्रमाण कमी आढळत आहे. पावसाच्या असमान वितरणामुळे विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोयाबीन पीक पाण्याच्या ताणास बळी पडून पाने पिवळी पडली. तर सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीमुळेही पाने पिवळी पडण्याची विकृती सोयाबीनमध्ये दिसून आली. तर तर कापूस पिकात बोंडे लाल होणे अथवा बोंडे सड या विकृती मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. पावसाचे मोजमाप करण्यासाठी पर्जन्यमापक उपयोगी ठरते. त्याचे साधे पर्जन्य मापक आणि स्वयंचलित पर्जन्यमापक असे दोन प्रकार आहेत.सूर्यप्रकाश व त्यातील विविध प्रकारच्या तरंगलांबीच्या किरणांची तीव्रता यावर वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्य निर्मिती अवलंबून असते. अन्ननिर्मितीसाठी सूर्यप्रकाशाची प्रतही महत्त्वाची ठरते. उदा. वनस्पतीच्या पानावरील पर्णरंध्रे उघडणे किंवा बंद होणे, अन्नद्रव्यांचे वहन (ट्रान्सलोकेशन), अन्नद्रव्याचे शोषण आणि त्याचे रूपांतर वनस्पतीच्या अन्न निर्मितीमध्ये होणे (फोटोट्रोपीझम आणि फोटोमार्फोझेनेसीस) इ. घटना सूर्यप्रकाशावर अवलंबून असतात. या सर्वांचा परिणाम अंतिमतः पीक उत्पादनावर होत असतो. सूर्यप्रकाशाची प्रत (लाइट क्वालिटी)- म्हणजेच वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त सूर्यप्रकाशाची तीव्रता/ विशिष्ट तरंगलांबीचे सूर्यकिरणे (उदा. सूर्यप्रकाशातील तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा इ.वर्णपट) वनस्पतीच्या वाढीच्या विविध टप्प्यात विशिष्ट प्रमाणात लागतात. सूर्यकिरणांची प्रखरता किंवा तीव्रता (लाइट इन्टेन्सिटी) - म्हणजे वनस्पतीवर किती प्रमाणात सूर्यकिरणे पडतात. दिवस व रात्र यांचे तास (डे लेंथ) म्हणजेच दिवसभरात किती तास सूर्यप्रकाश पडतो, हेही महत्त्वाचे असते. संपर्क- डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामान शास्त्रज्ञ आणि प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)