vegetables
vegetables  
कृषी प्रक्रिया

भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाची

डॉ. संजूला भावर, डॉ. अजय किनखेडकर

पॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो.त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो.साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. 

  • भाजीपाला काढणीची परिपक्वता ही टिकवण क्षमतेवर खूप परिणाम करते. भाजीपाला अपरिपक्व किंवा अतिपक्व अशा दोन्ही अवस्थेत काढल्यास गुणवत्ता कमी होते. काही पालेभाज्या व काकडी, गावर, मटार, भेंडी इ. अपरिपक्व अवस्थेत काढणी करावी लागते. जर काढणी करण्यास उशीर झाला तर हे अतिपक्व होऊन खाण्यायोग्य राहत नाही.
  • काढणीच्या वेळेवर भाजीपाल्याची गुणवत्ता व टिकवण क्षमता अवलंबून असते. भाजीपाल्याची काढणी करताना प्रामुख्याने आकारमान, पोत हे घटक लक्षात घेतात. त्यानुसार काढणी केली जाते. 
  • काढणी हाताने करतो की यंत्राने याचा फार मोठा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर परिणाम होतो. भाजीपाला यंत्राने काढणी केल्यास कापणे, ब्रशिंग करणे यांसारख्या क्रियेमध्ये भाजीपाल्याला जखमा होतात. त्यामुळे रोग वाढण्याची शक्यता अधिक होते. बहुतेक फळे व भाजीपाला तसेच सर्व फुले यांची काढणी हातानेच केली जाते. कंदवर्गीय भाजीपाला जसे की, कांदा, बटाटा, रताळे यांची काढणी यंत्राने केली जाते. 
  • एकदा का भाजीपाल्याची काढणी केली की त्यानंतर भाजीपाल्याची गुणवत्ता वाढत नाही, फक्त भाजीपाला खराब होण्याची क्रिया कमी करता येते. हा भाजीपाला वेगवेगळ्या प्रक्रियेने अधिक काळ टिकवून ठेवता येतो. त्यामध्ये भाजीपाला धुणे, प्रतवारी करणे, साठवणूक करणे इ. क्रियांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.
  • भाजीपाला धुणे व ब्रशिंग केल्यामुळे शेतातील माती, फवारणीचे अवशेष, मावा मुळे तयार झालेला चिकट पदार्थ इ. निघून जाते. मात्र ब्रशिंग केल्यामुळे बारीक इजा होतात. त्यामुळे रोग तयार होण्याची शक्यता वाढते, म्हणून शक्यतो भाजीपाला ब्रशिंग करणे टाळावे. 
  • साठवणुकीचे नियोजन  भाजीपाला थंड करणे : उष्णता निघून जाण्यासाठी भाजीपाला थंड करणे फार गरजेचे असते. भाजीपाला वेगवेगळ्या पद्धतीने थंड केला जातो. थंड केल्यामुळे भाजीपाल्याचा रंग, पोत, चव टिकून राहते, तसेच श्वसन क्रिया मंदावते, आतील पाण्याचा नाश कमी होतो, इथिलीनची निर्मिती कमी होते, भाजीपाला कुजण्याची क्रिया मंदावते. पॅकेजिंग : पॅकेजिंगचा भाजीपाल्याच्या टिकवण क्षमतेवर फार मोठा परिणाम दिसून येतो. जर एखाद्या पॅकेटमध्ये कमी गुणवत्तेचा माल असेल, तर तो एका पॅकेटमधून दुसऱ्य पॅकेटला लागतो. जर पॅकेजिंग चांगले असेल तर असे होत नाही. पॅकेजिंगमुळे श्वसन क्रिया मंदावते, भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो.त्यामुळे टिकवण क्षमता वाढवून भाजीपाला योग्य त्या ठिकाणी पाठवता येतो. साठवणूक : साठवणुकीच्या पद्धतीचा भाजीपाल्याचा पोत, टिकवण क्षमता, रंग यावर परिणाम होतो. साठवणुकीच्या वेळेस जर श्वसन क्रिया कमी असेल, आर्द्रता जास्त असेल तर भाजीपाला सुकत नाही. बहुतेक भाजीपाला साठवणुकीसाठी ८० ते ९० टक्के आर्द्रता लागते.

     - डॉ. संजूला भावर, ८६००३४४०९७ (विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र,खामगाव,जि.बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT