Department Of Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागाचा ‘टास्क फोर्स’ कागदावरच

राज्यात पशुपालकांची हानी रोखण्याच्या उद्देशाने कार्यदलाची (टास्क फोर्स) स्थापना करण्यात आली होती. मात्र सद्यःस्थितीत जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’सह इतर गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा ‘टास्क फोर्स’ कागदावरच असल्याचा आरोप केला जात आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर : राज्यात पशुपालकांची हानी रोखण्याच्या उद्देशाने कार्यदलाची (टास्क फोर्स) (Animal Husbandry Task Force) स्थापना करण्यात आली होती. मात्र सद्यःस्थितीत जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’सह (Lumpy Skin Disease) इतर गंभीर आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. जनावरे मृत्यू (Animal Mortality Rate) होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा ‘टास्क फोर्स’ कागदावरच असल्याचा आरोप केला जात आहे.

पाळीव प्राणी, कुक्कुट पक्षी व इतर पशुधनाला दरवर्षी संसर्गजन्य साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला याचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळे राज्यात मॉन्सूनपूर्व प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. मात्र त्यानंतर देखील साथरोगाचा प्रादुर्भाव होऊन जनावरे दगावण्याचे प्रकार घडतात. अशावेळी साथरोगाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी कार्यदलाची स्थापना करण्यात आली होती. त्यात अध्यक्ष म्हणून पशुसंवर्धन आयुक्त तर सदस्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, संशोधन संचालक, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालक, भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ आदींचा समावेश आहे. विभागस्तरावर प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त तर जिल्हास्तरावर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे अध्यक्ष आहेत.

कार्यदलाची जबाबदारी अशी...

प्रादुर्भावग्रस्त भागात विशेष पथक पाठवून उपाययोजना करणे

दर आठवड्याला बैठक घेणे

आजारावर उपाययोजना करून अहवाल सादर करणे

आजारांवर नियंत्रणासाठीच्या उपाययोजना होत असल्या तरी आजार बळावण्याची कारणे अनेक असतात. पशुसंवर्धन विभागाने ‘बर्ड फ्लू’च्या काळात चांगले काम केले. प्रतिबंधात्मक उपायांद्वारे वेळीच त्यावर नियंत्रण मिळवले. पशुपालकांचे नुकसान होऊ नये या साठी प्रयत्नशील आहोत. या वेळी देखील ‘टास्क फोर्स’ क्रियाशील असल्याने नुकसानाची तीव्रता कमी आहे.
सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन
‘टास्क फोर्स’ला दर महिन्याला बैठक घेण्याचे निर्देश आहेत. त्यांनी परिसरातील जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष देणे व साथरोग बळावू नये, यासाठी वेळीच उपाययोजना करणे अपेक्षित आहे. मात्र ‘टास्क फोर्स’ केवळ कागदावरच आहे. त्यामुळेच राज्यात दरवर्षी साथरोगांचा प्रसार होतो. हे पशुसंवर्धन खात्याचे मोठे अपयश आहे.
रविकिरण पाटील, पशुपालक, चांदूरबाजार, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisin Price: राज्यातील बेदाण्याचे दर टिकून राहण्याचे अंदाज

Banana Export: आखाती देशातील युद्धविरामाने केळी निर्यात सुरू

CM Devendra Fadnavis: गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करू: मुख्यमंत्री

National Agri Market: राष्ट्रीय बाजारासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

Monsoon Rain: उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT