अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत असल्याचे अनुभव काही शेतकरी सांगत आहेत. मागील हंगामात राज्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टर होते. मात्र राज्यातील कापसाची उत्पादकता राष्ट्रीय स्तरावरील उत्पादकतेपेक्षा फार कमी आहे. ती वाढवण्यासाठी एकात्मिक लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. उत्पादकता कमी असण्याची कारणे
लागवड व्यवस्थापन- महत्त्वाच्या टीप्स लागवड मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीवर करावी. हलक्या जमिनीत लागवड करू नये. सेंद्रिय खतांचा वापर पूर्वमशागतीच्या काळात शेवटच्या वखर पाळीपूर्वी कोरडवाहू लागवडीसाठी पाच टन शेणखत तर बागायतीसाठी १० टन शेणखत प्रति हेक्टर मातीमध्ये समप्रमाणात मिसळावे. पीक फेरपालट कापूस पीक एक पीक पद्धतीमध्ये घेऊ नये. त्यासाठी बागायती गहू, भुईमूग यानंतर लागवड करावी. तर कोरडवाहू लागवडीसाठी ज्वारी, सोयाबीन यांच्यानंतर कापसाचे पीक घ्यावे. वाण निवड वाणाची निवड हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. सध्या विविध कंपन्यांचे मोठ्या संख्येने वाण उपलब्ध आहेत. मागील हंगामातील अनुभव व वाणांच्या वैशिष्ट्यांवरून निर्णय घ्यावा. वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असावीत.
विद्यापीठांचे वाण मागील हंगामात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे अनुक्रमे एनएचएच ४४ बीटी व पीकेव्ही संकर २ हे बीटी वाण बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. लागवडीची वेळ
बिगर बीटी आश्रयात्मक बियाणे (रेफ्युजी) बाजारपेठेत उपलब्ध होणाऱ्या बियाण्यामध्ये वजनाच्या ५ टक्के प्रमाणात बिगर बीटी बियाणे हे बीटी बियाण्याच्या पाकिटामध्ये मिसळून देण्यात येणार आहे. लागवडीचे अंतर लागवडीचे अंतर ही देखील महत्त्वाची बाब असते. प्रत्येक विभागासाठी संबंधित कृषी विद्यापीठाने लागवड अंतराबाबत पुढीलप्रमाणे शिफारशी केल्या आहेत. मराठवाडा (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ)
विदर्भ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ)
खानदेश व पश्चिम महाराष्ट्र (महात्मा फुले कृषी विद्यापीठ)
बीज प्रक्रिया बाजारात उपलब्ध बियाण्याला रासायनिक कीडनाशकाची प्रक्रिया केलेली असते. मात्र बुरशीजन्य रोग व मातीतील अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्यासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशक सुडोमोनास फ्लुरोसन्स- मात्रा- १० ग्रॅम प्रति किलो बियाणे- मर व करपा रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी जीवाणूसंवर्धके अॅझोटोबॅक्टर (नत्र स्थिरीकरण) व स्फुरद विद्राव्य करणारे जीवाणू (अविद्राव्य स्फुरद विद्राव्य करण्यासाठी) मात्रा पावडर स्वरूपातील जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम किंवा द्रव स्वरूपातील ६ मिली प्रति किलो बियाणे महत्त्वाची टीप - बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतरच जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. आंतरपिके मागील काही वर्षांपासून पिकाची वाढ, फुले लागणे, बोंडे लागण्याच्या काळात पावसाचा खंड आदी बाबी अनुभवास येत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येते. हवामानाचा धोका कमी करण्यासाठी कापसामध्ये आंतरपीक घेणे फायदेशीर आहे. याशिवाय आंतरपिकांमुळे मातीची धूप थांबते. पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरते. द्विदलवर्गीय आंतरपिकांमुळे नत्र स्थिरीकरण होते. त्यामुळे कापसात पुढीलप्रमाणे आंतरपिके घ्यावी.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक अन्न्नद्रव्य व्यवस्थापनात सेंद्रिय खतांचा वापर, जिवाणू संवर्धके, हिरवळीची तसेच रासायनिक खते यांचा अंतर्भाव होतो. जागेअभावी या लेखात सविस्तर शिफारशी देणे शक्य नाही. तथापि पुढील लेखांत त्याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल. तण नियंत्रण तण नियंत्रणासाठी दोन वेळा निंदणी व तीन-चार वेळा वखरणी वा डवरणी करावी. सध्या मजुरांची उपलब्धता, मजुरीचे दर यामुळे निंदणी वेळेवर होत नाही. झाली तरी खर्चीक होत आहे. त्यासाठी तणनाशकांचे पर्याय वापरता येईल. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मजुरांची गरज कमी करून सामाजिक अंतर ठेवणेही शक्य होईल. कापसात उगवणी पूर्व आणि उगवणी पश्चात वापरावयाची तणनाशके पुढीलप्रमाणे आहेत. उगवणीपूर्व पेंडीमिथॅलीन प्रमाण २.५ ते ३.३ लीटर प्रति हेक्टर (२५ ते ३३ मिली प्रति १० लीटर) पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी मातीवर समप्रमाणात फवारावे. एक हेक्टरसाठी एकहजार लीटर पाणी वापरावे. उगवणीनंतर पायरीथायोबॅक सोडिअम- ६२५ मिली प्रति हेक्टर किंवा १२.५ मिली प्रति १० लीटर अधिक क्विझॉलफॉप इथाइल- ५०० मिली प्रति हेक्टर किंवा १० मिली प्रति १० लिटर (ही तणनाशके दोन्ही एकमेकांत मिसळून वापरण्याची ॲग्रेस्को शिफारस आहे.) वापरण्याची वेळ लागवडीनंतर २१ ते २८ दिवसांनी किंवा तणे २-४ पानावर असताना मूलस्थानी जलसंधारण कोरडवाहू लागवडीमध्ये जमिनीमध्ये अधिकाधिक पावसाचे पाणी मुरवणे आवश्यक आहे. यासाठी उतारास आडवी पेरणी करावी. मॉन्सून माघारी परतण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात वखराच्या वा डवऱ्याच्या जानोळ्यास वा जानकुडास दोरी अथवा पोते बांधून सऱ्या तयार कराव्यात. यामुळे शेवटच्या पावसाचे पाणी जमिनीमध्ये जास्त मुरेल आणि बोंडे भरण्याच्या काळात त्याचा फायदा होईल. संरक्षित पाणी देणे पिकास पाण्याची गरज पाते लागणे, फुले लागणे व बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त असते. या काळात पावसाची उघडीप वा खंड असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित सिंचन द्यावे. सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता कमी असल्यास सोडओळ पद्धतीने पाणी द्यावे. याकरिता लागवड जोडओळ पद्धतीने केल्यास फायदा होईल. संपर्क- डॉ. खिजर बेग, ७३०४१२७८१० (कापूस विशेषज्ज्ञ) अरविंद पांडागळे, ७५८८५८१७१३ (सहाय्यक कृषी विद्यावेत्ता) (लेखक कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कार्यरत आहेत.) ------------------------------------------------------------------------------------- कपाशीतील पीक संरक्षण टीप्स लागवडीआधी
लागवड करतेवेळी
लागवडीनंतर
तण व आंतरमशागत काही टीप्स
रोग नियंत्रण बीजप्रक्रियेसाठी शिफारस केलेली बुरशीनाशके
रोगाचे नाव | बुरशीनाशक | प्रमाण |
पानावरील कोनात्मक ठिपके | कार्बोक्झीन ७५ टक्के डब्ल्यूपी | २ ते २.५ ग्रॅम |
मूळकूज | टेट्राकोनॅझोल ११.६ टक्के एसएल | १.२ मिली |
फ़वारणीसाठीची बुरशीनाशके
पानावरील ठिपके
अल्टरनेरिया करपा
दहिया
संपर्क- डॉ. बसवराज भेदे, ९८९०९१५८२४ (लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.