Raju Shetty
Raju Shetty Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetty : सेंद्रिय शेतीच्या नावाखाली बुवाबाजी आणि फसवणूक सुरू ; राजू शेट्टींचे मत

Team Agrowon

Organic Farming : पूर्णत: सेंद्रिय शेतीकडे जाणं हा वेडेपणा ठरेल. सेंद्रिय शेतीच्या नावाखाली बुवाबाजी आणि फसवणूक सुरू आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते बुधवारी (ता.२२) सांगली येथील अग्रणी शिवार महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमा बोलत होते.

राज्य शेट्टी यांनी सेंद्रीय शेतीवर कडाडून टीका केली. सेंद्रिय शेतीमुळे अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल, याकडेही शेट्टी यांनी लक्ष वेधले.

शेट्टी म्हणाले, "सेंद्रिय शेती वाढली तर अन्नधान्य व अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. सगळ्या जगानं सेंद्रिय शेती करावी या मताचा मी नाही. कारण देश स्वतंत्र झाला त्यावेळी देश सेंद्रिय शेती करत होता."

देशातील वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरावयचे असेल तर केवळ सेंद्रिय शेतीवर भर देऊन चालणार नाही, असेही मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले, "रासायनिक खते, कीटकनाशके माहित नव्हते. त्यावेळी लोकसंख्या ३५-४० कोटीच्या आसपास असताना बाहेरच्या देशातून भीक मागून देशातील जनतेला अन्नधान्य खायला आणावे लागत होते.

आज ४० कोटीची लोकसंख्या १४० कोटीवर गेली, तेव्हा तरी रासायनिक खतांच्या वापरामुळे पुरेसं अन्नधान्य मिळत आहे."

दरम्यान, केंद्र सरकार व राज्य सरकारने सेंद्रिय शेतीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी केल्या आहेत.

राज्य सरकारने २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती अभियान राबवण्याची घोषणा राज्य अर्थसंकल्पात केली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT