Nagar News : नगर जिल्ह्यात अजूनही रब्बी हंगामातील पेरण्यांची गती कमीच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५९ टक्के म्हणजे सरासरीच्या २ लाख ७१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पुरेसे पाणी नसल्याने यंदा गव्हाची पेरणीही फारशी पुढे जाईना.
नगर जिल्ह्यात रब्बीत ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातील आतापर्यंत २ लाख ७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा खरिपातही पुरेसा पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले. दरवर्षी परतीचा पाऊस असल्याने दिवाळीनंतर पेरण्यांचे क्षेत्र वाढत असते.
यंदा मात्र परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पेरण्यांना फार वेग आला नाही. यंदा अनेक भागांत पुरेसे पाणी नसल्याने गहू, हरभरा, कांदा या पिकांचे क्षेत्र फारसे वाढताना दिसत नाही. आतापर्यंत गव्हाची ५५ टक्के, हरभऱ्याची ५१ टक्के, ज्वारीची सरासरीच्या ६० टक्के पेरणी झाली.
मका पेरणीने सरासरी ओलांडली असली तरी मक्याचे सरासरी क्षेत्रच कमी आहे. यंदा पावसाचा कांदा लागवडीवरही परिणाम दिसत होता. मात्र अवकाळी पावसाने ज्या भागात पाणी उपलब्ध झाले तेथे कांदा लागवड सुरू आहे.
कृषी विभागाकडून मात्र कांदा लागवडीची नोंद घेतली जात नाही. यंदा अजूनही पेरणी क्षेत्र कमी असल्याने आता त्यात फार क्षेत्रवाढ होईल, अशी शक्यता नाही.
पेरणी क्षेत्र (हेक्टर)
ज्वारी १ लाख ५८ हजार ७०३
गहू ४७ हजार ९५४
मका १९ हजार ०३,
हरभरा ४४ हजार ७६१
सूर्यफूल २०
करडई ११६
जवस १९
तीळ ३८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.