Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : खानदेशात सहा लाख टन ऊस गाळप

Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळपाला वेग आला असून, सुमारे सहा लाख टन ऊस गाळप झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊस गाळपाला वेग आला असून, सुमारे सहा लाख टन ऊस गाळप झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर गेल्या पाच ते सहा दिवसात तब्बल दीड लाख टन ऊस गाळप झाले आहे. यंदा ऊस गाळप अधिक होईल, असा अंदाज आहे. कारण दोन कारखान्याने गाळपासंबंधी यंदा वाढले आहेत.

सुमारे १२ हजार हेक्टरवर लागवड नंदुरबार जिल्ह्यात झाली होती. आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्टरवर आणि धुळ्यात सुमारे पाच हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. ऊस लागवड जशी वाढली, तसे गाळपही वाढणार आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव येथेही कारखाने गाळप करीत आहेत. हे कारखाने मागील हंगामात बंद होते. जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी फक्त एकच कारखाना ऊस गाळप करीत होता. यंदा तीन कारखाने गाळप करीत असून, हे तिन्ही कारखाने खासगी आहेत. धुळ्यातही एक लहान कारखाना किंवा गुऱ्हाळ सुरू आहे.

या कारखान्यातही रोज ५०० ते ७०० टन ऊस गाळप होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार साखर कारखाने ऊस गाळप करीत आहेत. यात दोन खासगी व दोन सहकारी कारखाने आहेत. सर्वाधिक ऊस गाळप समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान कारखान्याने केले आहे.

यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई (ता. मुक्ताईनगर) कारखान्याने ऊस गाळप केले आहे. आयान कारखान्याने यंदा सुमारे १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मध्यंतरी ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे ऊस गाळप थंड होते. यामुळे गाळपाचा आकडाही कमी दिसत होता. पण गेल्या १० दिवसात गाळपाला अधिक वेग आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT