ॲग्रो विशेष

पाणी उपलब्ध झाले तर समृद्धी येईल : गडकरी

टीम ॲग्रोवन

अकोला ः ‘‘शेतीचा विकासदर (Agriculture Growth Rate) वाढेपर्यंत देशाची प्रगती होऊ शकत नाही. शेतीसमोर पाणी (Water) ही आज मोठी समस्या आहे. त्यावर मात केली पाहिजे. पाण्याची उपलब्धता झाली तर बदल होतील. समृद्धी येईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित अमृत सरोवर लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले, पशू व मत्सविद्यान विद्यापाठीचे कुलगुरू डॉ. आशीष पातुरकर, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील आमदारांची या वेळी उपस्थिती होती.

‘‘गडकरी यांनी ग्रामीण भागातील समस्यांचे मूळ हे पाण्यात आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध करून ग्रामीण भाग समृद्ध करण्यासाठी देशात रस्त्यांसोबत तलाव निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग बुलडाणा जिल्ह्यात झाला. अकोला जिल्ह्यातही डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सहकार्यामुळे ३० तळी तयार झाली. त्यातून १९ गावांच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे आज शेतकरी लिंबासारखी फळबाग लावू लागले. आता उपलब्ध पाण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठाने यावर अध्ययन करावे,’’ असा सल्ला गडकरी यांनी दिला.

गडकरी म्हणाले,‘‘तळ्यांचे काम विदर्भात सर्वत्र झाले तर मोठी धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. बुलडाणा जिल्ह्याने यात चांगले काम करून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. या जिल्ह्यात १३२ तळे, २५ शेततळे, ८१ गाव तलाव तयार झाले. त्यामुळे २२ हजार विहिरींची पाण्याची पातळी वाढली. १५२ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटला.’’

‘‘हायड्रोजन, इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. आता शेतकरी केवळ अन्नदाता न रहता ऊर्जा दाता व्हावा, तरच तो आर्थिक दृष्टया समृद्ध बनेल,’’ असेही गडकरी म्हणाले.

दरम्यान, ‘अमृत सरोवर योजने’तून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय महामार्ग व जलसंधारणाची कामे झाली. अनेक तलाव पुनर्जिवीत करण्यात आले. या यशस्वी कामाची पाहणी गडकरी, भुसे यांनी केली.

देशी गायींच्या संशोधनावर भर

‘‘येणाऱ्या काळात देशी गायीच्या संशोधनावर भर देऊन दोन लिटर दूध देणाऱ्या विदर्भातील गायीला २० लिटर देणारी गाय करायचे आहे. त्यावर काम सुरू आहे. विद्यापीठांनीही यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यावर यापुढे भर असेल,’’ असे गडकरी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT